Hina Khan On Aamir Khan Third Marriage : हिना खाननं एका शोमध्ये आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – हिना खान आणि रुबिना दिलैक यांनी नुकताच त्यांचा नवीन यूट्यूब शो, ‘द पॉइंट ऑफ व्ह्यू’ सुरू केला आहे असून या शोमध्ये चालू घडामोडी आणि वादग्रस्त विषयांवर चर्चा करतात आणि आपली मतं मांडतात. अलीकडेच, हिना आणि रुबिना यांनी त्यांच्या पतीसोबत शिल्पा शिंदे आणि गौरव खन्ना यांच्या घटस्फोटावर चर्चा केली आणि आता त्यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरही भाष्य केलं आहे. हिनाने असंही म्हटलं आहे की, आपल्या समाजात तिसरं सलग्न अशुभ मानलं जातं.
अलीकडील एका एपिसोडमध्ये, हिना आणि तिचा पती रॉकी जैस्वाल यांनी एका सुपरस्टारच्या वैयक्तिक आयुष्याचा त्याच्या व्यावसायिक यशावर परिणाम होतो की नाही यावर चर्चा केली. शो दरम्यान, रॉकी जैस्वालनं आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर झालेल्या टीकेचा मुद्दा उपस्थित केला आणि या विषयावर त्यांचं मत विचारलं. Prashant Damle : आजकाल बाल्कनीचा प्रेक्षकवर्ग नाही, 500 रुपयांच्यावर आम्हाला जाता येत नाही; नाटकाच्या तिकीट दराबद्दल स्पष्टच बोलले प्रशांत दामले एका सुपरस्टारच्या वैयक्तिक आयुष्याचा त्याच्या चित्रपटांवर आणि कारकिर्दीवर परिणाम होतो, असं रुबिना दिलैकचं मत होतं, तर हिना खान म्हणाली, ‘असं असेल तर, आमिर खानचा एकही चित्रपट यशस्वी व्हायला नको.’ रुबिना म्हणाली की, आमिरचं आयुष्य कधीही मोठ्या वादांनी घेरलेलं नाही, तेव्हा हिना खाननं रुबिनाच्या बोलण्याला विरोध केला आणि आमिरच्या गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नाचा उल्लेख करत म्हणाली की, ‘हे काही कमी वादग्रस्त आहे का?’
त्यानंतर हिना खान पुढे म्हणाली, ‘सर्वसामान्य माणूस विचार करेल, ‘अरे! हा पुन्हा लग्न करतोय? दुसऱ्या बायकोला पण सोडलं?’ हे ऐकून रुबिनानं हिनाला मध्येच थांबवत म्हटलं की, ‘आपण जज का करत आहोत? आमिरने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, तरीही लोक त्याच्या कर्तृत्वापेक्षा त्याच्या लग्नावर जास्त लक्ष केंद्रित करतात.’ यावर हिना म्हणाली की, ‘मी आमिरला जज करत नाहीये. पण, रुबिना आपल्या समाजात एकापाठोपाठ एक लग्न करणं चांगलं मानलं जात नाही.’ यावर रॉकी जैस्वालनं उत्तर दिलं, ‘लग्न तर सोडाच, घटस्फोटसुद्धा चांगला मानला जात नाही.’ Dharmendra Pradhan Resignation : आता मागे हटायचं नाही! धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मराठी कलाकार खुश, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना दरम्यान, ६१ वर्षीय आमिर खाननं ५ जुलै २०२६ रोजी त्याच्या घरी गौरी स्प्रॅटसोबत लग्न केलं. हे अभिनेत्याचं तिसरं लग्न आहे. या लग्नामुळे आमिरवर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र, यावर अभिनेत्यानं स्पष्ट केलं की, गौरी हिंदू किंवा मुस्लिम नसून ख्रिश्चन आहे, आणि ती कोणत्याही धार्मिक श्रद्धांचं पालन करत नाही. त्याचं संपूर्ण कुटुंब सर्व धर्मांचं पालन करतं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा