Heavy rain warning in vidarbha possibility of thunderstorms and rain in the next 24 hours imd weather forecast; पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; विदर्भाला पाऊस झोडपणार, IMD चा ताजा अंदाज
Heavy rain warning in vidarbha possibility of thunderstorms and rain in the next 24 hours imd weather forecast; पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; विदर्भाला पाऊस झोडपणार, IMD चा ताजा अंदाज
नागपूर : विदर्भात पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भावर सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे विशेषतः पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर वाशिम, वर्धा, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश परिसरात उच्च दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, त्याचा परिणाम विदर्भातील हवामानावर होत आहे. या प्रणालीमुळे पुढील २४ तासांत अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन सुमारे २०० मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ऑरेंज अलर्ट असलेल्या वाशिम, वर्धा, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी १५० मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ शकते.
याशिवाय, सध्याच्या परिस्थितीत यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा किंवा शनिवारी सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, रविवारपासून विदर्भातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारनंतर विदर्भातील काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता कमी होईल आणि विशेष अलर्टही लागू राहणार नाही. मात्र, पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांनी अधिकृत सूचना आणि हवामान विभागाच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा