Headlines

Gondiya rumbling disputes in mahayuti praful patels important advice on unity to workers; महायुतीत वाढत्या कुरबुरी; प्रफुल्ल पटेलांनी कार्यकर्त्यांना दिला खास कानमंत्र


म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: राजकारणात काम करताना काही मतभेद निर्माण होणे साहजिक आहे. परंतु ते मतभेद कधीही मनभेदात रूपांतरित होऊ देऊ नका. महायुती ही विकास आणि जनतेच्या हितासाठी बांधलेली आघाडी आहे. कार्यकर्त्यांनी परस्परांमध्ये एकजूट ठेवून, परस्परांचा सन्मान राखून पुढे काम केले पाहिजे, असा सल्ला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला.

गोंदिया व भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भंडारा जिल्हा देखरेख सहकारी संस्था, भंडारा जिल्हा कृषी औद्योगिक संघ, भंडारा दुग्ध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा, कृषी उत्पन्न बाजार समिती पवनी, कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर, गोंदिया जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघ गोंदियाचे येथील संचालक व पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा रविवारी झाला. गोंदियातील एनएमडी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीच्यावतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना खासदार प्रफुल्ल पटेल बोलत होते.

Maharashtra Timesअजित पवार पुतण्याला बोलले, पण राम शिंदे भडकले; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे मोठी मागणी, नेमकं काय घडलं?

व्यासपीठावर आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, आमदार राजकुमार बडोले, आमदार राजू कारेमोरे, आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, शिवसेना नेते किरण पांडव, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, खासदार पटेल म्हणाले, महायुतीतील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपल्या विचारधारेनुसार कार्य करतात. परंतु आपण एकत्र आलो असल्याने जनतेसाठी आणि विकासासाठी एकच ध्येय ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्याची प्रगती व सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून आपण पुढे जायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत