Girish Mahajan On Uddhav Thackeray: कुंभमेळा प्रधिकरण कार्यालयातील सभागृहाचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. यानंतर जिल्हा परिषद जुन्या इमारतीच्या आवारात महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘अडीच वर्षे ठाकरे मुख्यमंत्री राहिले परंतु मंत्रालयात आले नाहीत. त्यांचा पक्ष साफ होत चालला आहे. इतकी वर्ष ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा जप करीत होते. ‘तेव्हाची तुमची भाषणे दाखवू का? आम्ही कुणालाही वाका किंवा झुका असे सांगत नाही. लोकच त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत. त्यांनी स्वप्ने पाहावीत, पण ती ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठरतील’, असा टोला मंत्री महाजन यांनी लगावला.
Nashik Crime : वैष्णवी आवारे मृत्यू प्रकरण; दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग, बॉयफ्रेंडला कळताच नको ते केलं, नाशिकमधील घटनेचा उलगडा
दर रविवारी आम्ही शहरात व शहरालगत झाडे लावत आहोत. आजदेखील आठ हजार झाडे लावली असून त्यापैकी काही सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या आवारात लावली. आपल्याकडील बरेचसे सांडपाणी नदीमध्ये जात असून यासाठीच दोन हजार कोटी रुपयांच्या एसटीपी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. हे काम चार महिन्यांत पूर्ण होईल. पाण्यावर प्रकिया करून त्याला पुन्हा नदीमध्ये सोडणार आहोत. रिंगरोड बाधित १५ ते २० टक्केच शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यासंदर्भात उपोषणकर्ते करण गायकर यांची भेट घेऊन मागण्यांवर निश्चितपणे मार्ग काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Nashik Fraud: दुप्पट सोन्याचं आमिष, नाशिकच्या माजी महापौरांच्या 200 तोळे दागिन्यांची लूट; सराफानं गंडवलं, प्रकरण काय?
ठाकरे गटाची ‘मानवी साखळी’
नाशिक : सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी शालिमार परिसरात मानवी साखळी करून पाठिंबा दर्शविला. ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीकरीता दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हे आंदोलन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी लांबलचक मानवी साखळी तयार करीत वांगचुक आणि दीपके यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत वांगचुक यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, नगरसेवक तात्या भामरे, सचिन बांडे यांसह पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान, मनमाडला शिवसेना ठाकरे गटातर्फे रविवारी सरकारचा निषेध करण्यात आला.

