Headlines

Five Indian players who played only one match and never played again


Team India player one match and never played again : भारतसाठी खेळण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं, ण पदार्पण केल्यावर पुन्हा कधीच खेळण्याची संधी न मिळालेले खेळाडूही आहेत. असे पाच खेळाडू आहेत ज्यांच्यावर ही वेळ आली. यामधील एकाने तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये २० वर्षे घालवली पण त्याला परत खेळायला मिळायला नाही.

Sudeep Tyagi Srinath Arvind Fiaz Fazal
Sudeep Tyagi Srinath Arvind Fiaz Fazal(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघामध्ये जागा मिळवण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, पण सर्वांचंच हे स्वप्न पूर्ण होतं असं नाही. जिद्द, मेहनत, चिकाटी आणि नशिबाच्या साथीने काहीजण तिथपर्यंत पोहोचले आणि आपले करियरही सेट केले. परंतु भारताचे पाच दुर्देवी असे खेळाडू आहेत ज्यांनी खडतर प्रवास करत जागा मिळवली पण त्यांनी एकच सामना म्हणजे आपला पदार्पण केले पण त्यांना पुन्हा कधीच संधी मिळाली नाही.

उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी याने २००९ साली भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. भारत आणि श्रीलंकेमध्ये हा सामना झाला होता. या सामन्यात सुदीपने पदार्पण करताना ६३ धावा दिल्या होत्या. पण एकही विकेट घेता आली नव्हती. त्यानंतर दुखापतींमुळे तो अनेकदा सामन्यांसाठी मुकलेला. त्यानंतर सुदीपला पुन्हा संघात जागा मिळाली नाही. एकच सामना खेळून बाहेर पडलेला सुदीप भारतासाठी फक्त एकच सामना खेळू शकला.

Maharashtra TimesIND vs SL Test Series : भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकले तर पॉइंट टेबलमध्ये भरारी नाहीच पण हरल्यावर मोठा फटका, कारण काय? जाणून घ्या
विदर्भाचा प्रसिद्ध खेळाडू माजी कर्णधार राहिलेल्या फैज फजलसुद्धाही एकच सामना खेळू शकला. जवळपास दोन दशके त्याने विदर्भाकडून खेळताना संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९१८४ धावा केलेल्या फैज याने २४ शतके आणि ३९ अर्धशतके केली होती. आपल्या नेतृत्वात फैजने विदर्भाला रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकवले होते. फैजने भारतासाठी वयाच्या ३० व्या वर्षी पदार्पण केले होते. २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध नाबाद ५५ धावा करत विजय मिळवून दिला होता. दुर्देवाने फैज एकच सामना खेळू शकला, पुन्हा त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

Maharashtra TimesAbhishek Porel Arrest : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचा आरोप; महिलेच्या तक्रारीनंतर क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक
श्रीनाथ अरविंद याने २ ऑक्टोबर २०१५ ला दक्षिण आफ्रिकेकडून टी-२० सामन्यात पदार्पण केले होते. फाफ डू प्लेसिस याला अरविंदने आऊट केले होते. श्रीनाथलाही पदार्पण सामन्यानंतर पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली नाही. २०११ च्या आयपीएल सीझनमध्ये श्रीनाथने १३ सामन्यात २१ विकेट नावावर केल्या होत्या. २०१८ मध्ये श्रीनाथ याने कर्नाटक संघाने विजय हजारे ट्रॉफी जिंकल्यावर क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

Maharashtra TimesBodhana Sivanandan Shreyas Royal : भारतीय वंशाच्या दोन युवकांचा ब्रिटिश बुद्धिबळात डंका; 11 वर्षांच्या बोधनाने रचला इतिहास, 17 वर्षीय श्रेयसही चॅम्पियन
पंजाबचे माजी क्रिकेटर पंकज धर्माणी यांनी घरगुती क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केले होते. या प्रदर्शनाच्या जोरावरच त्यांनी भारतीय संघात जागा मिळवली होती. १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पंकज यांना वनडे सामन्यात भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या सामन्यामध्ये सहाव्या क्रमांकावर त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली होती. परंतु ८ धावा करून ते आऊट झाले होते. त्यानंतर नयन मोगिंया हे संघात परतल्याने धर्माणी यांना पुन्हा संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.

Maharashtra TimesAjinkya Rahane : काय रे! निवृत्तीनंतर मला पहिला फोन सचिन पाजीचा आलेला, एकच गोष्ट बोलले; अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा
१९९९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध रॉबिन सिंह ज्युनियर यांनी भारतासाठी पहिला सामना खेळला होता. मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर रॉबिन यांनी वनडे सामना खेळत पदार्पण केले होते. पदार्पण सामन्यातच त्यांनी ७ ओव्हरमध्ये ५१ धावा दिल्या होत्या मात्र एकही विकेट घेता आली नव्हती. निवडकर्त्यांनी त्यानंतर पुन्हा त्यांना संधी दिली नाही, पदार्पण सामनाच त्यांचा अखेरचा ठरला.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा