Headlines

Eetha Movie Name Controversy Update By Mohit Narayangaonkar ; Eetha Movie : ईठाच्या निर्मात्यांनी दूर केली विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुबियांची नाराजी, नातवाची सकारत्मक प्रतिक्रिया, रिलीजला हिरवा कंदील


Mohit Narayangaonkar On Eetha : ईठा हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच त्याच्या नावावरुन वाद निर्माण झाला होता. विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबियांनीच या नावावर नाराजी दर्शवलेली. पण आता त्यांच्या नातवाने ही नाराजी दूर झाल्याचे सांगितले आहे.

eetha
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गेल्या काही दिवसांपासून ईठा हा सिनेमा चर्चेत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरवर चित्रीत झालेला हा सिनेमा प्रसिद्ध तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्यावर आधारित आहे. या सिनेमाचा टिझर रिलीज झाल्यापासून अनेकांना या सिनेमासाठी उत्सुकता लागली आहे. श्रद्धा उत्तम नृत्यांगना आहे हे सर्वज्ञात आहे शिवाय ती उत्तम मराठी सुद्धा बोलते त्यामुळे पडद्यावर मराठी पात्र साकारताना कशी दिसेल यासाठी सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

मात्र या सिनेमाबाबत वादही निर्माण झाला. काही दिवसांपूर्वी ईठा या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. या नावावर विठाबाईंच्या कुटुंबीयांनीच आक्षेप घेतलेला. सिनेमाचे नाव बदलावे अशी मागणीही केलेली त्यामुळे सिनेमा रिलीज होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले. आता विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra TimesTanvi Thakkar Divorce : लोकप्रिय अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांचा घटस्फोट, साखरपुड्यानंतर 7 वर्षांनी लग्न, मग 5 वर्षांनी काडीमोड!
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोहित नारायणगावकर यांनी सांगितले की निर्मात्यांनी दिलेल्या कारणामुळे आमच्या कुटुंबाची शंका आता दूर झाली आहे. सुरुवातीला आमची या चित्रपटाच्या शीर्षकावरून थोडी चिंता होती म्हणूनच आम्ही निर्मात्यांना ईठा ऐवजी विठाबाई नारायणगावकर असं नाव द्यावं अशी विनंती केलेली. मात्र नंतर निर्माते आणि दिग्दर्शकांनी आम्हाला या नावा मागचा त्यांचा विचार पटवून दिला. त्यांनी आम्हाला सांगितले की ग्रामीण महाराष्ट्रात लोक अजूनही विठाबाईंना ईठा म्हणूनच ओळखतात त्यामुळे या सिनेमासाठी हे नाव अगदी योग्य आहे. त्यांचं हे कारण ऐकल्यानंतर आमची शंका दूर झाली.

Maharashtra TimesAlpha Box Office : प्रेक्षकांचा भ्रमनिरास! आलिया भट्ट-शर्वरी वाघची नाही चालली जादू, पहिल्याच दिवशी अल्फाची गटांगळी
त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे आमच्या कुटुंबाचे समाधान झाले असून ग्रामीण महाराष्ट्र आणि त्याची संस्कृतीची मुळे प्रामाणिकपणे पडद्यावर मांडल्याबद्दल चित्रपटाचे कौतुक आहे.मोहित यांनी चित्रपटाबाबत सांगितले की अतिशय सुंदर चित्रपट बनवला आहे. हा सिनेमा पाहिल्यावर लोक नक्कीच म्हणतील की तुम्ही खरोखरच तमाशा परंपरा आणि मराठी संस्कृतीचे वारसदार आहात… माझा विश्वास आहे की प्रेक्षक हा चित्रपट मनापासून स्वीकारतील. तसेच हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधी श्रद्धा कपूर सह चित्रपटातील इतर कलाकारांनी टीम विठाबाईंच्या मूळ गावी नारायणगावला भेट देणार आहे.

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

विठाबाई नारायणगावकर यांच्या बद्दल सांगायचे झाल्यास त्या प्रसिद्ध तमाशासम्राज्ञी होत्या. त्यांच्या वडिलांचा स्वतःचा तमाशाचा फड होता. त्यामुळे अगदी बालपणापासूनच त्यांना तमाशा हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. पुढे वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावर या तमाशा फडाची जबाबदारी आली. कुटुंबाचं व फडातील काम करणाऱ्या व्यक्तींच पोट सांभाळण्यासाठी त्या तमाशाचे खेळ लावू लागल्या. त्यांच्या तमाशाच्या खेळांना प्रेक्षकांची तोबा गर्दी व्हायची. किंबहुना पोटात बाळ असताना सुद्धा त्या मंचावर आपल नृत्य सादर करायचा. एकदा असच प्रसूतीची वेळ झाली पण तरीही त्या नाचत होत्या. जेव्हा त्यांना समजलं आता कधीही आपल्याला बाळ होऊ शकतं तेव्हा त्या मंचाच्या पाठी गेल्या आणि बाळाला जन्म देऊन त्याची नाळ दगडाने ठेचून पुन्हा एकदा आपल्या कर्तव्याला पूर्ण करायला गेल्या म्हणजेच बाळाला जन्म दिल्यावर लगेचच त्या रंगमंचावर तमाशा सादर करण्यासाठी गेल्या. त्यांची ही प्रेरणादायी कहानी आता श्रद्धा कपूर द्वारे पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा