Headlines

Pune Lohagad Case Ketan Agrawal Grandfather Devichand Agrawal Passes Away


केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचं निधन झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान शनिवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

devichand agrawal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बंडू येवले, पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. होणाऱ्या बायकोने प्रियकरासोबत लोहगड येथून ढकलल्याने तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याचं निधन झाल्याची घटना ताजी असताना, आता अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतक केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद किशनलाल अग्रवाल यांचं निधन झालं आहे. नातव्याच्या हत्येच्या घटनेचा त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यांच्याकडून केतनला न्याय मिळावा यासाठी आंदोलनदेखील करण्यात आलं होतं. आपल्याच लोकांनी आपल्याला धोका दिल्याची भावना त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

देवीचंद अग्रवाल हे 83 वर्षांचे होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरु होते. नातवाच्या आठवणीत ते व्याकूळ झाले होते. आपल्या नातवासोबत घडलेल्या घटनेचा त्यांना मोठा धक्का बसला होता. ते सातत्याने या घटनेचा विचार करत होते. या घटनेनंतर कुटुंबातील एकंदरीत परिस्थितीमुळे ते चिंतेत होते.

घरातील तरुण मुलाचे निधन झाल्याने देवीचंद अग्रवाल अस्वस्थ होते. केतनचा सिया गोयल हिच्यासोबत लग्न जमवल्याचा त्यांना पश्चात्ताप होत होता. याच विचारात ते आजारी पडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. पण दोन दिवस आयसीयूत उपचार घेतल्यानंतर त्यांची प्राणज्योत आज मालवली.

देवीचंद अग्रवाल कँडलमोर्चात झाले होते सहभागी

दरम्यान, 27 जून रोजी पुण्यातील गहुंजे इथे केतनला न्याय मिळावा यासाठी कँडलमार्च काढण्यात आला होता. या मोर्चात केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. “आम्हाला आमच्याच लोकांनी धोका दिला. ज्यांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखत होतो त्याच लोकांनी आम्हाला धोका दिला”, अशी भावना देवीचंद अग्रवाल यांनी व्यक्त केली होती.

“सिया गोयल हिच्या कुटुंबियांनी तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे या लग्नाला जबाबदार असणाऱ्या सर्व लोकांची चौकशी करावी. आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळायला हवी”, अशी भूमिका देवीचंद अग्रवाल यांनी व्यक्त केली होती.

केतन अग्रवाल प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, केतन अग्रवाल प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. पण कोर्टाने ही मागणी फेटाळत आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जात आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा