Headlines

Dhurbe Elephant in Nepal returns 14 years later to kill 2 more members of Bote family Crime News; आधी आई-वडील, आता सून-नातू; एकाच हत्तीने 14 वर्षात बोटे कुटुंबातील चौघांना संपवलं, घर बदलून नदीपार जाऊनही शोधलं


Dhurbe Elephant in Nepal kills Family : शोकाकुल बोटे कुटुंबाने पुढील धोका टाळण्याच्या इराद्याने नदी ओलांडून सुमारे नऊ मैल दूर असलेल्या ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. वर्षामागून वर्ष उलटत गेली, तसं आपण वाचलो आहोत, असा समज त्या कुटुंबाने मनोमन करुन घेतला. पण जुलै महिन्याच्या सुरुवातीला, पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात संकटाची चाहूल लागली.

Dhurbe Elephant Nepal Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
काठमांडू : एका उन्मत्त हत्तीने १४ वर्षांच्या कालावधीत एकाच कुटुंबातील चौघा सदस्यांचा बळी घेतल्याची चकित करणारी घटना नेपाळमध्ये घडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, त्या हत्तीचा पुन्हा कधीही सामना करावा लागू नये, या आशेने हे कुटुंब आपले गाव सोडून अन्यत्र निघून गेले होते, तरीही ही दुर्दैवी घटना घडली.

शनीचारा बोटे यांच्या कुटुंबावरील या भयानक संकटाला डिसेंबर २०१२ मध्ये सुरुवात झाली. ‘धुर्बे’ नावाच्या या हिंसक हत्तीने नेपाळमधील चितवन राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेल्या माडी या शहरात त्यांच्या आई-वडिलांना तुडवून ठार मारले होते. ‘काठमांडू पोस्ट’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

घर बदललं, नदी ओलांडली

शोकाकुल शनीचारा यांनी पुढील धोका टाळण्याच्या इराद्याने आपल्या कुटुंबाला घेऊन राप्ती नदी ओलांडून सुमारे नऊ मैल दूर असलेल्या जगतपूरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. वर्षामागून वर्ष उलटत गेली, तसं आपण वाचलो आहोत, असा समज त्या कुटुंबाने मनोमन करुन घेतला. पण जुलै महिन्याच्या सुरुवातीला, पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात संकटाची चाहूल लागली.

जगतपूरमधील बोटे कुटुंबाच्या घरात धुर्बे हत्तीने शिरकाव केला. त्यांची २५ वर्षांची सून आशिका बोटे आणि चार वर्षांचा नातू भरत बोटे यांचा जीव घेतला.
Maharashtra TimesMother Son Reunion : आई आता जिवंत नसावी, घर सोडलेल्या माऊलीबद्दल लेकराचा समज, अडीच वर्षांनी चमत्कारिक भेट, मायलेकाला अश्रू अनावर

शोकाकुल कुटुंबाची प्रतिक्रिया

“मोठ्या नद्या ओलांडून पलिकडे गेल्याने आम्ही सुरक्षित राहू, असे आम्हाला वाटले होते. पण इतक्या वर्षांनंतर त्याच हत्तीने आम्हाला पुन्हा शोधून काढले. त्याने आमच्या घरावर हल्ला केला आणि माझ्या सुनेला आणि लहान नातवाला जीवे मारला. आता आमच्याकडे पळून जाण्यासाठी दुसरी कोणतीही जागा उरलेली नाही” असे बोटे यांनी ‘काठमांडू पोस्ट’ला सांगितले. या ताज्या हल्ल्यामुळे गेल्या १४ वर्षांच्या कालावधीत एकाच हत्तीच्या हल्ल्यात बोटे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा बळी गेल्याचे दिसते.

अत्यंत हिंसक हत्ती

‘धुर्बे’ हा नेपाळमधील अत्यंत कुख्यात आणि हिंसक हत्तींपैकी एक असून, गेल्या काही वर्षांत झालेल्या अनेक जीवघेण्या हल्ल्यांशी त्याचा संबंध जोडला गेला आहे. चितवन राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१० पासून आतापर्यंत या हत्तीमुळे २५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे.

पवारांची राष्ट्रवादी फुटणार? फडणवीस-जयंतरावांमध्ये खलबतं; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

“या दुर्दैवी घटनेपूर्वी ‘धुर्बे’मुळे २३ जणांचा बळी गेला होता” अशी माहिती चितवन राष्ट्रीय उद्यानाचे प्रतिनिधी अविनाश थापा मगर यांनी ‘काठमांडू पोस्ट’ला दिली.

विकीपीडिया पेजवरही उल्लेख

“जगतपूरमधील या ताज्या दोन बळींच्या घटनेनंतर, केवळ या एकाच हत्तीमुळे मृत्यू झालेल्यांची निश्चित संख्या आता २५ वर पोहोचली आहे,” असेही त्यांनी नमूद केले. धुर्बेच्या नावाचे एक विकिपीडिया पानही उपलब्ध आहे, ज्यामध्ये त्याने बळी घेतलेल्या त्या २५ जणांचा तपशील दिलेला आहे.
Maharashtra TimesCrime News : तुझे आंघोळीचे व्हिडिओ टाकू का; कॉलेज विद्यार्थ्याची तीन मुलांच्या आईवर वारंवार बळजबरी, अखेर जोडप्याचा ‘क्राईम पेट्रोल’ स्टाईल तोडगा
संभाव्य हल्ल्यांचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने वन्यजीव अधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून ‘धुर्बे’वर लक्ष ठेवले आहे. २०१६ मध्ये तो पुन्हा दिसून आला तेव्हा त्याच्या गळ्यात ट्रॅकिंग कॉलर बसवण्यात आली. मूळ कॉलर काम करणे थांबवल्यानंतर २०२० मध्ये नवीन कॉलर बसवण्यात आली आणि त्यानंतर २०२३ मध्ये ती पुन्हा बदलण्यात आली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा