Headlines

Chief Minister Devendra Fadnavis Has Reached Sensitive Kawande Village Gadchiroli : माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात पोहोचले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कवंडे गावात साधला पोलिसांची संवाद


Gadchiroli News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील कवंडे गावाला भेट दिली, जे माओवाद्यांचे प्रवेशद्वार मानले जाते. या दौऱ्यात त्यांनी नव्याने उभारलेल्या पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलिसांचे मनोबल वाढवले.

devendra fadnavis
(फोटोLipi)
महेश गुंडेट्टीवार, गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. ते भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर असलेल्या कवंडे या गावात आले. कवंडे हे गाव माओवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. छत्तीसगड राज्यातून माओवादी याच गावातून महाराष्ट्रात प्रवेश करतात. नुकतेच गेल्या 9 मार्च रोजी गडचिरोली पोलिसांनी याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन उभारले. या भागात 10 ते 15 किलोमीटर अंतरावर नेलगुंडा, पेनगुंडा आणि कवंडे असे तीन पोलीस स्टेशन उभारून माओवाद्यांचा प्रवेश द्वार बंद केला आहे.

आज या भागात अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात आले. यावेळी पोलिसांच्या जनजागरण मेळाव्यात त्यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू वाटप केले जाणार आहे. ते भागातील जनतेशी देखील संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे कालच लगतच्या छत्तीसगड राज्यात माओवाद्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकर याला ठार मारले. या घटनेला 24 तास पूर्ण झाले नाहीत.
Maharashtra Timesराज आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षात पडद्याआड मोठ्या घडामोडी? राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिसंवेदनशील भाग असलेल्या कवंडे गावात पोहोचले आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या पोलिसांनी छत्तीसगडच्या सीमेमध्ये जाऊन देखील ऑपरेशन केली आहेत, त्यामुळे मला असे वाटते की, पोलीस आणि प्रशासन दोघेही मिळून शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेले आहेत. छत्तीसगडमध्ये केंद्र सरकारच्या मदतीने काम सुरू आहे सुरक्षेचे. यामुळे चारही बाजूंनी माओवाद्यांची कोंडी होणार.

छत्तीसगडमध्ये जी भरती होत होती ती चिंतेची बाब होती. मात्र, आता केंद्र सरकारने मिळून माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात खातमा केला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस जवान राहत असलेल्या टेंट आणि कंटेनरची पाहणी केली. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या भागातील परिस्थिती अवगत करून दिली. त्यांनी पोलिसांसोबत देखील संवाद साधला आहे. काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्धाटन करण्यात आले.

शितल मुंढे

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.आणखी वाचा