Chandrashekhar Bawankule: कुंभमेळ्याच्या नावाखाली रिंगरोडसाठी शेतकऱ्यांवर भूसंपादनाचा दबाव टाकला जात आहे. ४ मे रोजी जाहीर झालेल्या यादीत नसलेल्या जमिनींच्या सर्व्हे क्रमांकांचा नंतरच्या यादीत समावेश केला.

नाशिकच्या रिंगरोडबाबत आमदार सरोज अहिरे यांनी बुधवारी (दि. ८) विधिमंडळाबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. ९) विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रिंगरोड भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न उपस्थित केला.
Suhas Kande On Bhujbal: भुजबळांच्या खात्यात घोटाळा! आमदार सुहास कांदेंचा गंभीर आरोप, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
काही बड्या व्यक्ती आणि कंपन्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठीच आराखडा बदलण्यात आला. जमिनीच्या मोजणीवेळी गरीब शेतकऱ्यांना घराबाहेर काढण्यात आले, तसेच काही ठिकाणी महिलांना धक्काबुक्की करण्यात आल्याच्या तक्रारीही त्यांनी मांडल्या. यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका संशयास्पद असल्याने संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांनीच रस्त्यालगतच्या जमिनी आधीच खरेदी केल्या आणि त्यासाठी ‘अलाइन्मेंट’ बदलले, असा आरोप आमदार सरोज अहिरे यांनी केला. त्यांनी या प्रकरणात सचिन चिंतावार आणि संजय चहांदे यांच्यासह काहींची नावे घेतली हेाती.
कांदेंकडून भुजबळांच्या चौकशीची मागणी
मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. भुजबळांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या धान्य वाहतुकीच्या चार हजार कोटींच्या निविदेत सहाशे कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत आमदार कांदे यांनी विधिमंडळात आंदोलन केले आहे. माजी खासदार समीर भुजबळांवर गंभीर आरोप करत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी कांदेंनी केली आहे.
Moushumi Chatterjee : अभिनेत्री मौशमी चॅटर्जींना दणका, नाशिकच्या निवृत्त डॉक्टरला मानसिक त्रासाची भरपाई द्या, ग्राहक आयोगाचे आदेश
जबरदस्तीने भूसंपादन नाही
कुंभमेळ्यासाठी रिंगरोड महत्त्वाचा असला तरी विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन होईल. बाधितांना कायद्यानुसार योग्य आणि रास्त मोबदला दिला जाईल. प्रकल्पाची माहिती आधीच लीक करून ज्यांनी जमीन खरेदीचे गैरव्यवहार केले असतील, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. ‘तीन दिवसांत चौकशी पूर्ण केली जाईल. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर दबाव आणला असेल किंवा महिलांशी गैरवर्तन केले असेल, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल,’ अशी ग्वाही बावनकुळे यांनी सभागृहात दिली.
Malegaon Farmer: मालेगावात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; लाखो रुपयांची फसवणूक, पोलिस अधिकाऱ्याची उचलबांगडी, प्रकरण काय?
घरपट्टी घोटाळाही चर्चेला
महापालिकेच्या नाशिकरोड व गांधीनगर कर भरणा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पासवर्डचा गैरवापर करत केलेला ४५ लाखांचा अपहार प्रकरण विधिमंडळात पोहचले आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या या अपहार प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली नसल्याचे सांगत, आमदार नितीन पवार यांनी याबाबत विधिमंडळात ताराकिंत प्रश्न उपस्थित केला आहे. मार्च २०२२ मध्ये नाशिकरोड तसेच गांधीनगर येथील कर भरणा केंद्रातील सॉफ्टवेअरशी छेडछाड करून ४५ लाखांचा अपहार उघडकीस आला होता. त्यामुळे आज होणाऱ्या चर्चेकडे लक्ष लागून आहे.

