पत्नी घर सोडून गेली म्हणून केली संसाराची राख रांगोळी; दारूच्या नशेत पतीने केले असे काही की…| Maharashtra Times
आशिष इझनकर, वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाचा संसार अक्षरशः राखेत मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पतीने स्वतःच्या घराला पेटवून दिल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले, तर घराबाहेर उभे असलेले दुचाकी वाहनही जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी…
