Headlines

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण:वाझेने 100 कोटी वसुलीसाठी रचला होता कट, एनआयए कोर्टात वाझे, शर्मांसह 10 वर दोषारोप

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन उभे करणे, या घटनेतील साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या साडेचार वर्षांपूर्वीच्या प्रकरणात मुंबईतील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने शनिवारी बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे, माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह १० आरोपींविरोधात ‘यूएपीए’, हत्या आणि गुन्हेगारी कटाचे औपचारिक दोषारोप निश्चित केले. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्रानुसार १००…

Read More

Raj Thackeray: दरवर्षी अठरा कोटींची दानचोरी; सिद्धिविनायक मंदिराबाबत राज ठाकरेंचा गंभीर आरोप – raj thackeray claims rs 18 cr donation theft at mumbai shree siddhivinayak temple annually

Raj Thackeray On Siddhivinayak Donation Theft: मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांची चोरी होते, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांची चोरी होते. ही चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पकडण्यातही आले आहे. मात्र या प्रकरणाची पाळेमुळे…

Read More

Maharashtra Weather Update; Orange Alert for Ghats & Yellow for Districts

राज्यात पावसाचा जोर अद्यापही असमान स्वरूपाचा कायम असून, पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, घाटमाथ्यावरील भागांसाठी ऑरेंज अलर्ट तर राज्यात . १ ऑगस्ट रोजी पुणे घाट, कोल्हापूर घाट आणि सातारा घाट परिसराला अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर ठाणे,…

Read More

Government Job Scam : एक किंवा दोन नाही, तर तब्बल 117 जणांना सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवलं, खोटी नियुक्तीपत्रे वाटली

बारामतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी नोकरीचं आमिष दाखवत तब्बल 117 जणांची फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपींकडून बनावट याद्या आणि नियुक्तीपत्रे देखील देण्यात आल्याचं समोर आलं आहे. Source link

Read More

गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक:आरोपींना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी; 25 ते 30 कुटुंबं संकटात

मोर्शी शहरातील दीप कॉलनी परिसरात एका दाम्पत्याने इतर दोन आरोपींसह नागरिकांची तब्बल ७ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनुसार, आरोपी दाम्पत्याने सुरुवातीला नातेवाईक आणि परिचितांकडून एक…

Read More

अमरावतीत माजी सैनिकांच्या समस्यांवर ऑनलाईन तोडगा:कर्नल नवनीत दुग्गल यांच्या 'ऑन स्पॉट' ऑर्डरने प्रश्न मार्गी

नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया हेडक्वार्टरमधून कर्नल (वेटरन्स) नवनीत दुग्गल यांनी शनिवारी अमरावतीला भेट दिली. माजी सैनिकांच्या सैन्य प्रशासनाशी संबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश होता. त्यांनी उपस्थितांच्या समस्या समजून घेत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ऑनलाईन संपर्क साधून तात्काळ ‘ऑन स्पॉट’ आदेश दिले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे अनेक…

Read More

विभागीय आयुक्तांकडून 22 महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार:संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवण्याचे आवाहन

महसूल दिनानिमित्त विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवण्याचे आवाहन केले. महसूल विभाग हा शासनाचा कणा आणि मुख्य चेहरा आहे. सामान्य जनता शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल प्रशासनाकडे पाहते. त्यामुळे या विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या वर्तनात शिस्त, संवेदनशीलता आणि सहानुभूती आणून…

Read More

पूरग्रस्त 16 जणांचे वाचले प्राण:जिल्हा बचाव पथकाने एकाच रात्री दोन आव्हानांवर केली मात

अमरावती जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा येथे आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या १६ जणांना जिल्हा शोध व बचाव पथकाने एकाच रात्री सुरक्षित बाहेर काढले. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पथकाने धाडसी बचावकार्य करत अनेकांचे प्राण वाचवले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे बेंबळा नदीला आलेल्या पुरामुळे ९ जण छतावर अडकले होते. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी रात्री ११ च्या सुमारास अचानक वाढले…

Read More

बडनेरा मतदारसंघात 47,890 मतदारांचे पत्ते गायब:नावे वगळण्याची भीती, निवडणूक आयोगासमोर मोठा पेच

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण मोहिमेदरम्यान बडनेरा विधानसभा मतदारसंघात एक मोठा पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघात तब्बल ४७,८९० मतदारांचे पत्ते गायब झाले आहेत. आयोगाने निश्चित केलेली मुदत संपायला अवघे सात दिवस उरले असल्याने, या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक…

Read More

बालिकेच्या मृत्यू प्रकरणात ग्रामसेवक निलंबित:असमाधानकारक खुलास्यानंतर आणखी दोघांवर कारवाईची शक्यता

चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत अंतर्गत हनुमानढाणा गावात एका बालिकेचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात ग्रामपंचायत अधिकारी विनायक मालसिंग धुर्वे यांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी घडली होती. धुर्वे यांच्यावर कामात हयगय, प्रचंड निष्काळजीपणा आणि वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा आरोप आहे. चिखलदरा येथील गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जारी केले आहे….

Read More