सीईओ गांधींचे 23 ग्रामपंचायतींना मार्गदर्शन:विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी तालुक्यातील विकासकामे विहित मुदतीत, दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ग्रामविकासात लोकसहभाग, स्वच्छता, गुणवत्तापूर्ण सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. संत गाडगेबाबा उन्नत ग्राम अभियान अंतर्गत चांदूर बाजार पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली…
