Good news rainfall intensity expected to increase in next three days in marathwada; आनंदाची बातमी! पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, मराठवाड्यातील बळीराजाची चिंता दूर होणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणांतील विसर्ग कायम आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असून रविवारी सायंकाळी जायकवाडीचा पाणीसाठा ५१.४४ टक्के झाला. धरणात ६८ हजार १४३ क्युसेक आवक होत आहे, अशी माहिती ‘कडा’ विभागाने दिली आहे. विभागात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे….
