- Marathi News
- Opinion
- Ayodhya Ram Mandir Donation Theft; Navneet Gujar Column On Citys Painful Past
4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

सध्या देशभरात चर्चा आहे ती अयोध्येतील श्रीराममंदिराची आणि मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीची.काही जण म्हणतात, मोठ्या लोकांना वाचवले जातआहे व लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे. तरसरकारचे म्हणणे आहे की, दोषी कुणीही असो, त्यालाशिक्षा टाळता येणार नाही.
रामधनाची चोरी केव्हापासून सुरू होती व किती रक्कमलंपास झाली, हे अद्याप स्पष्ट नाही. तपासादरम्यानकाहींच्या घरातून सोने-चांदी जप्त झाल्याचे सांगितलेजाते. काहींकडून मंदिराच्या दानपेट्याच जप्त केल्याचे समोर आले आहे. या तपासातून अखेर काय निष्पन्नहोईल, हे अद्याप सांगता येत नाही. या प्रकरणात कोण कुणाला वाचवत आहे किंवा कुणाला गोवण्याचा प्रयत्नहोत आहे, याचा अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. मात्र तपास करणाऱ्या विशेष तपास पथकावर (एसआयटी) कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा प्रशासकीय दबाव येऊ नये, ही राज्य सरकारचीजबाबदारी आहे. शक्य असल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा. तसेच मंदिरातील देणगीचेनिष्पक्ष व स्वतंत्र ऑडिट झाल्याशिवाय चोरीची खरीरक्कम समोर येणे कठीण आहे. या घटनेमुळेअयोध्येच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्वालाहीधक्का बसला आहे. अयोध्येचा पहिला उल्लेखअथर्ववेदात आढळतो. त्यामध्ये अयोध्येचे वर्णनदेवतांची नगरी म्हणून केले गेले – “अष्टचक्रा नवद्वारादेवानां पुरयोध्या.” ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मनू यांनी भगवानविष्णूंच्या सल्ल्याने व विश्वकर्म्यांच्या देखरेखीखाली यानगरीची स्थापना केली होती. स्कंदपुराणानुसार अयोध्याभगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्रावर वसलेली आहे.त्याशिवाय वैवस्वत मनू यांनी ही नगरी प्रथमवसवल्याचेही मानले जाते. अयोध्येसाठी अशा घटनानवीन नाहीत. या देवनगरीने वैभव, पराक्रम आणि त्यागपाहिला. डोंगराएवढी दुःखेही अनुभवली. ऋषितुल्यराजा मांधाता यांचे साम्राज्य पाहिले, तर सत्यासाठीसर्वस्वाचा त्याग करणाऱ्या राजा हरिश्चंद्रांचे जीवनहीअनुभवले. कैकेयीने युद्धात तुटलेल्या रथाच्या चाकातस्वतःचे बोट अडकवून केलेला त्याग पाहिला तर त्याचकैकेयीच्या हट्टामुळे प्रभू श्रीरामांना वनवासालाजातानाही पाहिले. अयोध्येची तुलना स्वर्गाशी केलीगेली, पण तिच्या वेदनांनाही अंत नव्हता. पुत्रवियोगानेराजा दशरथांनी प्राणत्याग केला. भरताने सिंहासननाकारून श्रीरामांच्या पादुकांची पूजा केली. लक्ष्मणानेचौदा वर्षे अखंड सेवा केली, तर ऊर्मिलेने विरह सहनकेला. त्रेतायुगापासून कलियुगापर्यंतच्या असंख्य कथाया नगरीच्या इतिहासात कोरल्या गेल्या.
आज श्रीराम मंदिरात भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेतायेते. त्या जन्मभूमीसाठी साडेचारशे वर्षांहून अधिककाळ संघर्ष झाला. कधी संत, धर्मगुरूंनी याआंदोलनाचे नेतृत्व केले. कधी राजकीय पक्ष त्यातसहभागी झाले. आंदोलनामुळे अनेक सरकारेकोसळली.काही सत्तेत आली. या आंदोलनाला मोठीगती मिळाली ती बाबरी मशिदीचे कुलूप उघडल्यानंतर.शाहबानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय केंद्रानेमुस्लिम समाजाच्या दबावाखाली बदलल्यानंतर हिंदूसमाजात नाराजी निर्माण झाली. त्यानंतर 1 फेब्रुवारी1986 रोजी बाबरीचे कुलूप उघडले. त्या बंददरवाजांमागे संघर्ष दडलेला आहे, याची कुणालाहीकल्पना नव्हती. अशोक सिंघल यांच्या शिलापूजनामुळेहे आंदोलन घरोघर पोहोचले. आज अशोक सिंघलहयात असते, तर त्यांना काय वाटले असते? त्यांनीआयुष्य मंदिरासाठी संघर्षात घालवले आणि अखेर “श्रीराम मंदिर उभे राहताना पाहणे हीच अखेरची इच्छाआहे,” असे म्हणत या जगाचा निरोप घेतला.
अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी शेकडोनव्हे, तर हजारो लोकांनी अनेक वर्षे संघर्षकेला. अनेकांनी प्राणांचीही आहुती दिली.अशा मंदिरात देणगीच्या रकमेतील कथितचोरीच्या घटनांमुळे त्यांच्या आत्म्यालाकिती वेदना झाल्या असतील, याचीकल्पनाही करणे कठीण आहे.
