Headlines

Aruna Irani : अरुणा इराणींबद्दल मेहमूद यांनी पसरवलेली अफवा, अभिनेत्रीचं करिअर आलेलं धोक्यात; दादा कोंडके आले मदतीला धावून, काय घडलेलं?


Aruna Irani Mehmood Relationship : अरुणा इराणी आणि मेहमूद यांची लव्हस्टोरी कायम चर्चेचा विषय ठरली आहे. अरुणा यांनी एका मुलाखतीमध्ये मेहमूद यांच्यासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

Aruna Irani Mehmood Relationship
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अरुणा इराणी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असायच्या. अभिनेत्रीनं मेहमूद यांच्यासोबत लग्न केल्याच्या अफवा होता. एका मुलाखतीत अरुणा इराणी यांनी सांगितलेलं की, मेहमूद यांच्यासोबत त्या रिलेशनशिपमध्ये होत्या. पण, त्यांचा ब्रेकअप झाला.

मेहमूद यांच्याबद्दल काय म्हणाल्या अरुणा इराणी?

याबद्दल बोलताना अरुणा इराणी एका मुलाखतीत म्हणालेल्या की, ‘डान्स डायरेक्टर सुरेश भट्ट मला म्हणाले, तू मेहमूद यांना पटवण्याचा प्रयत्न कर, म्हणजे, ते तुला काम मिळवून देऊ शकतात. पण तिथेही, मी मेहमूदला हो-नाही म्हणत राहिले. तरीही, त्यांनी मला काम द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक विशेष स्थान निर्माण झालं. त्यांच्यामुळे मला पैसा, प्रसिद्धी आणि नाव मिळालं आणि मी विचार केला, ‘मी या माणसाला अजून किती काळ फसवू शकेन?’ मग आम्ही मित्र झालो, आणि नंतर मित्रांपेक्षा जास्त, पण तेवढंच.’ मेहमूद आधीच विवाहित असल्यामुळे त्यांनी अरुणा इराणी यांच्यासोबत लग्न केलं नाही.

Maharashtra TimesPrasad Oak : पक्ष आणि विचारधारा हा मुद्दा नव्हताच, जीव ओतून भूमिका केली, ना शिंदेंकडून त्रास, ना ठाकरेंकडून; ‘धर्मवीर’बद्दल प्रसाद ओकचं वक्तव्य
अरुणा यांनी सांगितलं की, काम मिळवण्यासाठी त्यांना खूश करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. महमूद यांनी केवळ अभिनेत्रीचं करिअर घडवलंच नाही, तर ते उद्ध्वस्तही केले. अभिनेत्री म्हणाली, ‘मी त्यांना खूश करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मी खूप गरीब कुटुंबातून आले होते, त्यामुळे नाव, प्रसिद्धी आणि पैसा मी पहिल्यांदाच पाहिला.’ ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरुणा इराणी बोलत होत्या.

Maharashtra TimesEmraan Hashmi Grandmother Purnima : इम्रान हाश्मीची आजी होती सुप्रसिद्ध अभिनेत्री, महेश भट्ट यांच्याशीही जवळचं नातं; मधुबाला- नर्गिससोबत तुलना, अर्थिक तंगीमुळे विकावा लागलेला जमीन जुमला
मेहमूद आधीच विवाहित होते आणि त्यांना अभिनेत्रीसोबत लग्न करायचं होतं. ‘मी लग्नासाठी नकार दिला आणि ते माझ्यासाठी चांगलंच झालं.’ असं अरुणा यांनी सांगितलं. अरुणा यांनी नकार देताच मेहमूद यांनी अनेक ठिकाणी आपण अरुणा इराणींशी लग्न केल्याच्या अफवा पसरवल्या. यामुळं चित्रपट निर्मात्यांनी अरुणा यांना काम देणंच बंद केलं. मेहमूद यांच्यासोबतच्या लग्नाच्या अफवांमुळे अरुणा इराणी यांचं करिअर धोक्यात आलं. तेव्हा सुप्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके त्यांच्या मदतीला धावून आले. दादा कोंडके यांनी अरुणा यांना आपल्या चित्रपटात काम दिलं आणि त्यामुळे अभिनेत्रीला पुन्हा इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ

दरम्यान, मेहमूद यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ (१९७२) आणि ‘कारवाँ’ (१९७१) यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये अरुणा इराणी यांना भूमिका दिल्या. तसेच त्यांनी १९६० आणि १९७० च्या दशकातील ‘हमजोली’ (१९७०), ‘नया जमाना’ (१९७१) यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा