Headlines

Ajit pawar ncp indranil naik appointed as guardian minister of gondia district after ncp babasaheb patil resigned from the post; हसन मुश्रीफांनंतर अजितदादांच्या आणखी एका शिलेदाराने पालकमंत्रिपद सोडलं


गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही महिन्यांपूर्वी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री सोडल्यानंतर आता आणखी एका मंत्र्याने पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा काल वरळी इथं जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली. पाटील यांनी पालकमंत्रिपद सोडल्यानंतर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यावर गोंदियाच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बाबासाहेब पाटील हे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यात फारसे येत नसल्याची तक्रार गोंदियातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडूनच पक्षनेतृत्वाकडे केली जात होती. काही दिवसांपूर्वी विदर्भात झालेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही जाहीरपणे या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता अखेर बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असून आता इंद्रनील नाईक हे गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव आपण हा निर्णय घेत असल्याचं बाबासाहेब पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे. त्यामुळे चालताना प्रॉब्लेम येत असल्याने लांबचा प्रवास शक्य होत नसल्याने मी ही जबाबदारी सोडत असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.

विदर्भात भाजपनेही केले होते फेरबदल

जिल्ह्यात वेळ देत नसल्याच्या कारणातून भाजपनेही काही दिवसांपूर्वी पालकमंत्रिपदी फेरबदल केले होते. मंत्री संजय सावकारे यांच्याकडून भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी काढून घेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. संजय सावकारे यांच्याबाबत जिल्ह्यातील पक्षसंघटनेत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, भाजपनंतर आता राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या पालकमंत्रिपदीही फेरबदल करण्यात आल्याने जिल्ह्याला वेळ न दिल्यास पद सोडावं लागेल, अशा इशाराच सत्ताधारी महायुतीतील पक्षांनी आपल्या पालकमंत्र्यांना दिल्याचं दिसत आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत