Headlines

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना ‘दुबार’ दिलासा! कर्जमाफीपाठोपाठ 48 हजार कोटींच्या वीजबिलमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा


मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेपाठोपाठ राज्यातील शेतकऱ्यांना वीजदिलासा मिळाला आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे ४८ हजार कोटी रुपयांचे थकीत वीजबिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. वर्षअखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमुक्ती देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ सरकारने जाहीर केली आहे. २०१९च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या किसान मोर्चाच्यावतीने बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी थकीत ४८ हजार कोटींचे वीजबिल माफ करण्याची घोषणा केली.

Maharashtra TimesMaharashtra Politics : एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठक, दोन मंत्रिपदांची चिन्हं, महाराष्ट्राबाबत महत्त्वाची चर्चा
‘कर्जमाफीच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना ९५ हजार कोटी रुपयांचे साह्य दिले जात असून, कृषी क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही. शेतकऱ्यांना सातत्याने कर्जमाफी द्यावी लागत असेल, तर शेतीची अवस्था कठीण आहे, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. त्यामुळे शेती फायद्याची व्हावी, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याशिवाय पर्याय नाही’, असेही फडणवीस म्हणाले.

महावितरणच्या कृषी वीज ग्राहकांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने २०२४च्या पावसाळी अधिवेशनात ‘ मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ‘ जाहीर केली होती. त्यानुसार, राज्यातील साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंप ग्राहकांना एप्रिल, २०२४पासून मोफत वीज दिली जात आहे.

तेव्हा या योजनेचे ४४ लाख ३ हजार शेतकरी लाभार्थी होते. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या थकबाकी माफीचा लाभ ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ लागू होण्यापूर्वीच्या महावितरणच्या कृषी वीज ग्राहक थकबाकीदारांना होईल, असे सूत्रांनी सांगितले.
Maharashtra TimesTukaram Mundhe : ब्रँडवर अंधविश्वास नको! भेसळयुक्त दूध ओळखायचं कसं? तुकाराम मुंढेंनी सांगितल्या प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी
शेतमालाला बाजारपेठ
शेतीच्या क्षेत्रात नव्या पद्धती, नवे तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नव्या संधी दिसल्या आणि त्याची फळे आता दिसू लागली आहेत. ‘जलयुक्त शिवार’मुळे शेतकरी तीन-तीन पिके घेऊ लागला आहे. शेतमालाला आता जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मात्र, उत्पादकता वाढवून उत्पादन खर्च कमी करावा लागेल. गटशेतीच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येईल. पुढच्या काळात शेतकऱ्यांचे गट तयार केले तर शेतकऱ्यांना पूरक पिके घेता येतील आणि शेती हा उद्योग फायद्यात आणता येईल,’ असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

दुष्काळमुक्त विदर्भासाठी प्रयत्न’
राज्यात ५२ टक्के भाग अवर्षणप्रवण असताना अनेक भागांत पावसाचे पाणी समुद्रात जाऊन वाया जाते. गोदावरी, तापी खोऱ्यांत हे पाणी यावे, यासाठी वैनगंगा, नळगंगा सारख्या योजनांतून वाहून जाणारे पाणी उचलले जाईल. त्यासाठी सुमारे २४ नवी धरणे आणि १६ जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Maharashtra TimesBacchu Kadu: कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू; बोगस बियाण्यांवरुन बच्चू कडूंचा इशारा
मुख्यमंत्री म्हणाले…
-शेतकऱ्यांची पाटी कोरी व्हावी आणि या पाटीवर त्याला नवा इतिहास लिहिता यावा, यासाठी हा निर्णय
-अधिक गुंतवणूक आणि उद्योग सेवा क्षेत्राच्या सहभागातून शेती अधिक सक्षम, समृद्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न
-नियोजनबद्ध प्रयत्नातून शेतीची अर्थव्यवस्था बदलून शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट
-नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी व्यापक योजना आणि नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्याचा प्रयत्न

उच्च दर्जाच्या बियाणांसाठी धोरण
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. निकृष्ट किंवा बनावट बियाणांमुळे त्यांचे नुकसान होऊ नये आणि बियाणे उत्पादन, साठवणूक, तपासणी व विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण व्हावे, यासाठी सर्व संबंधितांच्या सूचनांचा विचार करून राज्य सरकार सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत