Headlines

नवी मुंबईत ५१ सीएनजी बस सेवेत, आणखी १०० बस लवकरच ताफ्यात येणार; प्रवास सुखद होणार| Maharashtra Times


NMMT Buses: नवी मुंबई शहरातील वाढत्या प्रवासी संख्येसाठी एनएमएमटीच्या ताफ्यातील बस सेवा वाढवण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत ५१ बस दाखल झाल्या असून लवकरच आणखी १०० बस दाखल होतील.

नवी मुंबई सीएनजी बस
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या ५१ नवीन बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसचे लोकार्पण वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. यापाठोपाठ आणखी १०० सीएनजी बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. त्यामुळे एनएमएमटीकडील बसची संख्या वाढून प्रवाशांना चांगली बससेवा मिळू शकणार आहे.

घणसोलीत लोकार्पण पूर्ण

घणसोली येथील परिवहनच्या बस आगारात या ५१ बसचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील, परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, पाणीपुरवठा समितीचे सभापती रविकांत पाटील, प्रभाग समिती अध्यक्षा ललिता मढवी, नगरसेवक, परिवहन समिती सदस्य तसेच अधिकारी उपस्थित होते. या नव्या पर्यावरणपूरक बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वास वनमंत्री नाईक यांनी व्यक्त केला आहे.

सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात ४१६ बस कार्यरत आहेत. नव्याने १५० सीएनजी बसचा समावेश करण्यात येत असून, त्यापैकी ६५ बस उपक्रमाला मिळाल्या आहेत. उर्वरित ८५ बस लवकरच ताफ्यात दाखल होणार आहेत. ६५ पैकी ५१ बसचे लोकार्पण शनिवारी झाले आहे. सीएनजी बसमुळे इंधन खर्चात बचत पर्यावरण होण्याबरोबरच संवर्धनालाही चालना मिळेल, असे सांगण्यात येते. लोकार्पणासाठी या बस फुलांनी आकर्षक सजवण्यात आल्या होत्या. या बसचे लोकार्पण करून मंत्री गणेश नाईक यांनी तिकीट काढून बसने प्रवासी केला.

बस फेऱ्यांच्या संख्या वाढणार

दोन वर्षांपूर्वी परिवहन उपक्रमाच्या ताब्यात सरासरी ५०० बस होत्या. मात्र यातील शंभर बस भंगारात गेल्यावर बसची संख्या कमी झाली. त्यामुळे शहरातील अनेक बस मार्गावरील बस फेऱ्या कमी झाल्या आहेत. एक बस निघून गेल्यावर दुसरी बस जवळपास एका तासाने येते. दोन बस धावण्यामधील अंतर वाढल्याने प्रवाशांचा वेळ बसची वाट बघण्यातच वाया जात असतो. प्रवाशांना बसची वाट बघत ताटकळत बसथांबांवर उभे राहावे लागत आहे. त्यामुळे बस वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. आता आलेल्या सीएनजी बसमुळे महत्त्वाच्या मार्गांवरील बस वाढतील अशी अपेक्षा आहे.

यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी, नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत ४०० महिलांना बसचालक प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे भविष्यात एनएमएमटीमध्ये महिला बसचालक कार्यरत होतील, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड यांनी परिवहन उपक्रम स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

Maharashtra TimesMumbai AC Local: गर्दीच्या वेळी ‘एसी लोकल’मधील एसी पडला बंद , १५ मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध

एक हजार बसची गरज

बसमधील प्रवाशांची संख्या लक्षात घेता परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ८०० ते १००० बसची गरज आहे. मात्र परिवहनच्या ताब्यातील बसची संख्या पाचशेच्या घरातही नाही. यामुळे अनेक मार्गावर प्रवासीसंख्या मोठी असूनही बससंख्या अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसची वाट पाहत राहावे लागते. दोन बस फेऱ्यांमध्ये अंतरही मोठे आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमात आणखी बस लवकरात लवकर येण्याची गरज लवकर येण्याची गरज आहे, असे सांगण्यात येत आहे.

बेस्टच्या ई-बसच्या तुलनेत सीएनजी बसने प्रवास अधिक सुखद होतो का बेस्टप्रमाणे एनएमएमटीमध्ये सुद्धा ई-बस दाखल झाल्या पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा