Palghar Rain: राज्यात सर्वत्र तीन दिवसांपासून संततधार सुरु आहे. पालघरमध्ये घराची भिंत अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. एक तरुण नदीपात्रात बुडाला, तर एक जण बेपत्ता आहे.

पालघर नगरपरिषद हद्दीतील जुना पालघर परिसरात घरात शिरलेले पाणी बाहेर काढत असताना घराची भिंत अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. जखमी महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर पालघर मनोर रस्त्यावरील सज्जन पाडा या गावातील चंदन वरठा (वय २८) हा तरुण बुधवारी रात्री मासवण येथे सूर्या नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेला होता. तो नदीपात्रात बुडाला. तर डहाणू तालुक्यातील पेठ (केदारपाडा) येथील विठ्ठल केदार (५५) हे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सूर्या नदीवर मासेमारी करण्यासाठी गेले होते. परंतु अद्यापपर्यंत घरी परतलेले नाहीत. नदीच्या आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू आहे.
Women Farmer Bill: विनासातबाराही शेतकरी प्रमाणपत्र; महिला शेतकरी विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी, तरतुदी काय?
दरम्यान, तालुक्यातील पूर्व भागातील धुकटण गावातही एका घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. जुना पालघर परिसरात पावसाचे पाणी अनेक घरांत शिरले होते. शब्बीर सय्यद हे कामानिमित्त बोईसर येथे गेले असताना, त्यांच्या पत्नी राबिया यांनी घरात पाणी शिरल्याची माहिती देत त्यांना तातडीने घरी बोलावले. दोघेही घरातील पाणी बाहेर काढत असतानाच जुन्या घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत राबिया शब्बीर सय्यद (वय ४७) गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने पालघर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शब्बीर सय्यद हेही या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.
पालघर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील धुकटण (काकरीपाडा) येथे वादळी पावसामुळे रात्री उशिरा नारायण केवश काकरा यांचे घर कोसळून नुकसान झाले. दरम्यान, जाणता राजा सामाजिक सेवा संस्था, धुकटण-पालघर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पालघर येथून ताडपत्री आणून बाधित कुटुंबाला तात्पुरता आसरा उपलब्ध करून दिला.
Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने 2.80 कोटींचा निधी मंजूर केला; दिंड्यांना किती अनुदान मिळणार?
सूर्या कालव्याचे काँक्रीटीकरण गेले वाहून
डहाणू : तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या पावसात सूर्या प्रकल्पाच्या उजव्या तीरावरील सारणी येथील कालव्याचे नव्याने केलेले काँक्रीटीकरण वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. कामादरम्यान निकृष्ट साहित्य वापरल्याच्या तक्रारी यापूर्वीही झाल्या होत्या. उपअभियंता संदीप सरगर यांनी पावसाच्या प्रवाहामुळे कालव्याचा काही भाग खचल्याचे सांगत पाऊस थांबल्यानंतर तातडीने दुरुस्ती केली जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे सचिव जितेश पाचलकर यांनी केली आहे.

