![]()
जेव्हा आमिर खानला त्यांची पहिली पत्नी, दुसरी पत्नीआणि होणारी पत्नी यांच्यासोबत एकाच कारमध्ये प्रवासकरताना पाहिले गेले, तेव्हा साहजिकच खळबळ उडाली.काहींनी याला आधुनिक म्हटले, तर काहींना ते विचित्रवाटले. अनेकांना तर हे समजलेच नाही. पण कदाचितआपण एक मोठी गोष्ट दुर्लक्षित करत आहोत. आपण मिश्र कुटुंब ही संकल्पना उदयाला येताना पाहतआहोत. ही कल्पना पाश्चात्त्य समाजांत अनेक काळापासूनसामान्य आहे, पण भारतात ती अजूनही संशयाने पाहिलीजाते. आपल्याकडे लग्नाला पवित्र मानले जाते,घटस्फोटाला अजूनही कलंक मानले जाते आणि कौटुंबिकन्यायालयात अशा वादांची गर्दी असते, जे अनेकदालग्नापेक्षाही जास्त काळ चालतात. भारतात घटस्फोटालापिढ्यान्पिढ्या एका युद्धासारखे सादर केले गेले. त्यात एकखलनायक आणि एक पीडित असणे आवश्यक होते. कुटुंबेदोन गटांत विभागली जात. मुले या सर्वांचा सर्वाधिकफटका सोसत असत. घटस्फोटित पती-पत्नी एकमेकांच्याआयुष्यातून पूर्णपणे गायब होत, केवळ वकील आणिन्यायालयाच्या आदेशांमार्फत त्यांचा संपर्क उरत असे. पणआता एक शांत बदल सुरू होत आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी वारंवार या गोष्टीवर भरदिला आहे की, जरी त्यांचे लग्न संपले असले तरी त्यांचेकुटुंब संपलेले नाही. हृतिक रोशन आणि सुझैन खानयांनीही घटस्फोटानंतर यशस्वी संयुक्त पालकत्वाचेकदाचित भारतातील सर्वात मोठे उदाहरण मांडले आहे. तेकौटुंबिक कार्यक्रमांत एकत्र सहभागी होतात, महत्त्वाचेसण-उत्सव सोबत साजरे करतात. त्यांनी आपल्या मुलांच्याहिताला स्वतःच्या अहंकारापेक्षा वर ठेवण्याचा एकजाणीवपूर्वक निर्णय घेतल्याचे दिसते. हे महत्त्वाचे आहेकारण सेलिब्रिटी केवळ आपले मनोरंजन करत नाहीत, तरते शक्यतेची एक नवी दिशाही दाखवतात. अशा देशात जिथे घटस्फोटित स्त्रियांना अजूनही विचारलेजाते की ‘काय चुकले होते?’ आणि जिथे घटस्फोटितपुरुषांना स्वतःच्या अधिकारांसाठी लढण्यास प्रोत्साहित केलेजाते, तिथे घटस्फोटित पती-पत्नीला सार्वजनिक कटुता नठेवता एकत्र पाहणे हे खोलवर रुजलेल्या धारणांना आव्हानदेते. हे सूचित करते की घटस्फोट नेहमीच अपयश नसतो.अनेकदा हे केवळ आयुष्यातील एक बदल असते. अर्थात, सेलिब्रिटींचे आयुष्य हे आदर्श मानून चालणारनाही. आर्थिक समृद्धी अनेक गोष्टी सोप्या करते. आया,समुपदेशक, एकापेक्षा जास्त घरे, लवचिक दिनचर्या आणिआर्थिक सुरक्षा यामुळे ते ताण कमी होऊ शकतात, ज्यांचासामना सामान्य कुटुंबांना करावा लागतो. तरीही हे तत्त्वमहत्त्वाचे आहे. प्रश्न असा नाही की दोन व्यक्ती आयुष्यभर विवाहित राहूशकतात का? प्रश्न हा आहे की, लग्न संपल्यानंतरही त्याएकमेकांबद्दल आदर आणि सद्भावना ठेवू शकतात का?मुले या प्रक्रियेत असतात, तेव्हा हे अधिक महत्त्वाचे ठरते.जगभरातील संशोधन सांगते की, पालकांमधील दीर्घकाळचालणाऱ्या संघर्षाचा मुलांना अधिक त्रास होतो. दोन शांतघरांच्या दरम्यान राहणारे मूल, एकाच तणावपूर्ण घरातअडकलेल्या मुलापेक्षा अधिक चांगल्या स्थितीत असते. देश बदलत आहे. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होतआहेत. लोक उशिरा लग्न करत आहेत. लग्नाकडूनअसणाऱ्या अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. साहजिकचघटस्फोटांचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत, वरदिलेले प्रसंग एक पर्यायी कथा मांडतात, ज्यामध्येघटस्फोटित पती-पत्नी एकमेकांचे सहकारी बनून राहूशकतात आणि मुलांना कुणा एकाची बाजू घेण्यास भागपाडले जात नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
Source link
मेघना पंत यांचा कॉलम:मार्ग वेगवेगळे झाले याचा अर्थ मनांतही अंतर असावे असा होत नाही
