Headlines

Akola bjp forms new power structure in akot after scrapping alliance with mim; टीकेनंतर भाजपने MIM सोबतची आघाडी गुंडाळली, पण अकोटमध्ये सत्तेसाठी आता नवा पॅटर्न


म. टा. वृत्तसेवा, अकोला: अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपने एमआयएमसोबत आघाडी केल्याने राज्यभर चर्चा झाली होती. ही आघाडी गुंडाळून ठेवल्यानंतर भाजपसमोर सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. त्यातून मार्ग काढत अकोटमध्ये सत्तेचा एक नवीन पॅटर्न उदयास आला आहे. यावेळी एमआयएम, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांना दूर ठेवण्यात आले आहे. भाजपने शिवसेना, शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षासोबत आघाडी केली.

अकोट नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या माया धुळे विजयी झाल्या. मात्र नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापनेकरिता सदस्य संख्या कमी असल्याने भाजपने एमआयएम सोबत आघाडी केली. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या आघाडीच्या चर्चेने खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे स्थानिक भाजपने केलेल्या या आघाडीला गुंडाळून ठेवावे लागले.

आता सत्ता ताब्यात घेण्याकरिता अकोट शहर विकास मंच हा गट स्थापन करण्यात आला आहे. तसा प्रस्ताव सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. या नवीन गटात भाजप, शिवसेना, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश आहे. यात नगराध्यक्षांसह एकूण २१ नगरसेवक आहेत. या गटात एमआयएमचा समावेश नसून त्यांच्या स्वतंत्र गटाला मान्यता देण्यात आली. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या मंचापासून दूर आहे. नगर परिषदेत काँग्रेसचे ६, एमआयएमचे ५ तर ‘वंचित’चा एक नगरसेवक आहे.

डिसेंबर महिन्यात झालेल्या अकोट नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपद भाजपला मिळाले .नगरसेवकांच्या ३३ जागांपैकी भाजपाला सर्वाधिक ११ जागा मिळवता आल्या. उपनगराध्यक्ष, विषय समित्यांसह अन्य सत्तेसाठी बहुमताचा आकडा मात्र भाजपकडे नव्हता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी भाजपसह, एमआयएम, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, प्रहार जनशक्ती, या पक्षांची मोट बांधत अकोट शहर विकास मंच गठीत करण्यात आला. मात्र या आघाडीचे पडसाद उमटताच पुन्हा यातील काही पक्षांना बाहेर करण्यात आले. आता अकोट विकास मंचामध्ये भाजपचे ११, राष्ट्रवादी काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १, शिवसेना १, शिवसेना (उबाठा) २ व प्रहारच्या ३ सदस्यांचा समावेश आहे.

राज्यातील महायुतीमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांचा समावेश नसताना स्थानिक व सोयीच्या राजकारणासाठी मात्र महायुतीच्या ध्येय धोरणाला तिलांजली देत, या दोन्ही पक्षांना जवळ घेत भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत