Smart Meter Project : स्मार्ट मीटर’ मोहिमेला आता वेग आलाय. मेसेजनंतर 48 तासांत मीटर घरी पोहचणार आहे. पण नागरिकांनी स्मार्ट मीटरविरोधात संताप व्यक्त केला आहे.

स्मार्ट मीटरविरोधात शेकडो नागरिकांचं आंदोलन
नागरिकांचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करण्यापूर्वी अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करणे आवश्यक आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असताना स्मार्ट मीटर लावण्याऐवजी खंडित वीजपुरवठ्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत नुकसानभरपाईची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी काही ग्राहकांनी केली आहे. टिटवाळा परिसरात वारंवार होणाऱ्या वीजखंडितीच्या विरोधात तसेच स्मार्ट मीटरविरोधात शेकडो नागरिकांनी आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी स्मार्ट मीटर योजनेला विरोध कायम ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा! 298 गावांमध्ये सर्वेक्षण होणार; 40 तालुक्यातील 409 गावांना जोडणार
मागील काही दिवसांपासून महावितरणकडून स्मार्ट मीटरच्या वापराबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात वाढ झाल्याचा दावा काही ग्राहकांनी केला असून यासंदर्भात त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तक्रारी नोंदवल्या आहेत. तक्रारींचे समाधानकारक निराकरण होत नसल्याची भावना काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
नेमके फायदे काय आहेत?
स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांची पूर्वसंमती घेतली जात आहे का, तसेच त्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. याशिवाय ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या अनामत रकमेचा वापर आणि त्याबाबतचा तपशीलही सार्वजनिक करावा, अशी अपेक्षा काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे. स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांमध्ये विविध प्रश्न आणि शंका उपस्थित होत असताना महावितरणने याबाबत अधिक व्यापक जनजागृती आणि संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Nashik News : शाळांमध्ये उत्सवी प्रवेश, पण आदिवासींना नाही गणवेश! फाटक्या कपड्यांमध्ये पोरांचं स्वागत, आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित; जबाबदार कोण?
महावितरणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
४८ तासांत मीटर बदलण्याच्या संदेशांमुळे चर्चा
वीजबिल वाढल्याचा काही ग्राहकांचा दावा
अखंड वीजपुरवठ्याची नागरिकांची मागणी
टिटवाळ्यात शेकडो नागरिकांचे आंदोलन
महावितरणच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
Pune News : पुणेकरांनो आजपासून पाणीपुरवठा दिवसाआड होणार! पाणीकपातीचं मोठं आव्हान, पाहा वेळापत्रक
स्मार्ट मीटरचे फायदे
वीजबिल प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप दूर होऊन ग्राहकांचा वेळ वाचणार.
मोबाईल अॅपद्वारे ग्राहकांना विजेच्या वापराचे व्यवस्थापन करता येणार.
स्मार्ट मीटर लावलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराबद्दल प्रतियुनिट ८० पैशांची सवलत मिळेल.
वीजसेवा, बिलांसंदर्भातील शंकांचे तातडीने निराकारण होणार.
वीजचोरी, मीटरमधील फेरफाराला आळा बसणार.

