Headlines

Mahavitaran Smart Meter Campaign Citizens Anger Over Meter Protest in Kalyan; स्मार्ट मीटर’ मोहिमेला वेग, पण मीटरबाबत नागरिकांचा संताप, कारण काय? स्मार्ट मीटरचे नेमके फायदे कसे?


Smart Meter Project : स्मार्ट मीटर’ मोहिमेला आता वेग आलाय. मेसेजनंतर 48 तासांत मीटर घरी पोहचणार आहे. पण नागरिकांनी स्मार्ट मीटरविरोधात संताप व्यक्त केला आहे.

Smart Meter Project
स्मार्ट मीटरचे फायदे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, कल्याण : महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला कल्याण-डोंबिवली परिसरात नागरिकांचा वाढता विरोध होत आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अपेक्षित लाभ मिळणार नसून वीज वितरण व्यवस्थापनासाठीच हा निर्णय घेतल्याचा आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत विद्यमान मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याचे संदेश ग्राहकांना प्राप्त झाल्यानंतर नाराजी अधिक तीव्र झाली आहे.

स्मार्ट मीटरविरोधात शेकडो नागरिकांचं आंदोलन

नागरिकांचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करण्यापूर्वी अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करणे आवश्यक आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असताना स्मार्ट मीटर लावण्याऐवजी खंडित वीजपुरवठ्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत नुकसानभरपाईची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी काही ग्राहकांनी केली आहे. टिटवाळा परिसरात वारंवार होणाऱ्या वीजखंडितीच्या विरोधात तसेच स्मार्ट मीटरविरोधात शेकडो नागरिकांनी आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी स्मार्ट मीटर योजनेला विरोध कायम ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
Maharashtra TimesShaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा! 298 गावांमध्ये सर्वेक्षण होणार; 40 तालुक्यातील 409 गावांना जोडणार
मागील काही दिवसांपासून महावितरणकडून स्मार्ट मीटरच्या वापराबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात वाढ झाल्याचा दावा काही ग्राहकांनी केला असून यासंदर्भात त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तक्रारी नोंदवल्या आहेत. तक्रारींचे समाधानकारक निराकरण होत नसल्याची भावना काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

नेमके फायदे काय आहेत?

स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांची पूर्वसंमती घेतली जात आहे का, तसेच त्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. याशिवाय ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या अनामत रकमेचा वापर आणि त्याबाबतचा तपशीलही सार्वजनिक करावा, अशी अपेक्षा काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे. स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांमध्ये विविध प्रश्न आणि शंका उपस्थित होत असताना महावितरणने याबाबत अधिक व्यापक जनजागृती आणि संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Maharashtra TimesNashik News : शाळांमध्ये उत्सवी प्रवेश, पण आदिवासींना नाही गणवेश! फाटक्या कपड्यांमध्ये पोरांचं स्वागत, आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित; जबाबदार कोण?

महावितरणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

४८ तासांत मीटर बदलण्याच्या संदेशांमुळे चर्चा

वीजबिल वाढल्याचा काही ग्राहकांचा दावा

अखंड वीजपुरवठ्याची नागरिकांची मागणी

टिटवाळ्यात शेकडो नागरिकांचे आंदोलन

महावितरणच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
Maharashtra TimesPune News : पुणेकरांनो आजपासून पाणीपुरवठा दिवसाआड होणार! पाणीकपातीचं मोठं आव्हान, पाहा वेळापत्रक

स्मार्ट मीटरचे फायदे

वीजबिल प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप दूर होऊन ग्राहकांचा वेळ वाचणार.

मोबाईल अॅपद्वारे ग्राहकांना विजेच्या वापराचे व्यवस्थापन करता येणार.

स्मार्ट मीटर लावलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराबद्दल प्रतियुनिट ८० पैशांची सवलत मिळेल.

वीजसेवा, बिलांसंदर्भातील शंकांचे तातडीने निराकारण होणार.

वीजचोरी, मीटरमधील फेरफाराला आळा बसणार.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा