Headlines

Rohit Pawar Take Back Hunger Strike After Meet Minister Girish Mahajan Over Farmers Loan Waiver


रोहित पवारांनी अखेर तीन दिवसांनी आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात रोहित पवारांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर रोहित पवार यांनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.

Rohit Pawar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अखेर आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं आहे. त्यांच्या पंढरपूर येथील आंदोलनस्थळी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन दाखल झाले. गिरीश महाजन यांची संकटमोचक नेते अशी ख्याती आहे. त्यामुळे रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन थांबवण्यात त्यांना यश येतं का? ते पाहणं महत्त्वाचं होतं. त्यात त्यांना यश आलं आहे. रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता. तीन दिवसांपासून उपोषण केल्यामुळे रोहित पवार यांची आज प्रकृती ढासळली. त्यांच्या शरीरातील बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. तसेच डॉक्टरांनी रोहित पवारांना सलाईन लावण्याची विनंती केली. पण रोहित पवारांनी मंत्री गिरीश महाजन आल्यानंतर सलाईन घेऊ, अशी भूमिका घेतली. अखेर रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास गिरीश महाजन आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर रोहित पवारांनी उपोषण सोडलं.

मंत्री गिरीश महाजन यांचा दुपारी भेटीसाठी येत असल्याचा मेसेज रोहित पवारांना आला होता. त्यांनतर रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास दाखल झाले. दरम्यान, सोलापूरच्या माळशिरस येथे पीकअप विहिरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेतील जखमींच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन आधी माळशिरसला गेले होते. त्यानंतर ते रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले.

यावेळी गिरीश महाजन आणि रोहित पवार यांच्यात चर्चा झाली. गिरीश महाजन यांनी चर्चेतून विषय सोडवण्याची विनंती सुरुवातीला केली. यासोबतच मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजन यांचं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं. मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर गिरीश महाजन यांच्या विनंतीनंतर रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.

गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना अन्नत्याग आंदोलन करण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणं अपेक्षित होतं, असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली असती तर चर्चेतून मार्ग निघाला असता, असं गिरीश महाजन म्हणाले. गिरीश महाजन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर बातचित केली. यानंतर पावसाळी अधिवेशनाच्याआधी या विषयावर आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक होईल. या बैठकीत मार्ग काढला जाईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं.

यावेळी गिरीश महाजन यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. आगामी पावसाळी अधिवेशन हे 22 जून पासून सुरु होणार आहे. त्याआधी रोहित पवार आणि शेतकरी नेत्यांचं शिष्टमंडळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडेल. यावेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिली. यानंतर रोहित पवारांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. पंढरपुरात श्री नामदेव पायरीवर नतमस्तक होऊन आपण उपोषण सोडू, असं रोहित पवार यावेळी म्हणाले. यानंतर सर्वजण नामदेव पायरीवर नतमस्तक करण्यासाठी निघाले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा