Chandrashekhar Bawankule: हेक्टरी सव्वालाख रुपये दर यासाठी निश्चित करण्यात आला आहे. याहून कमी दराचा करार करता येणार नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महसूल विभागाच्या बैठकीच्या निमित्ताने शुक्रवारी बावनकुळे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी गैरआदिवासींना देण्याची कुठलीही तरतूद कायद्यात नव्हती. आता या जमिनी गैरआदिवासींना भाडेतत्त्वावर देता येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष हा भाडेपट्टा भरावा लागणार आहे.
Gadchiroli News: माओवाद्यांकडून एकतर्फी युद्धबंदीची घोषणा; कारवाई थांबविण्याचे केंद्र सरकारला आवाहन
खनिजाचा प्रतिटन मोबदला द्यावा लागणार
आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीत असलेल्या गौण खनिजाची खासगी कंपन्यांना उत्खनन आणि विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. करार झाल्यानंतर उत्खनन केलेल्या गौण खनिजाच्या तुलनेत प्रतिटन किंवा प्रतिब्रास हा मोबदला आदिवासी शेतकऱ्याला द्यावा लागेल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.
Maharashtra Weather Update: नवरात्रीत मेघगर्जना! २५ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, IMDकडून अलर्ट जारी
टीकेवरुन पडळकरांशी बोलणार
राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे नेते जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करून टीका करणे चुकीचे आहे. ही भाजपची संस्कृती नाही. राजकारणात विरोधकांवर टीका केली जाते. मात्र व्यक्तिगत भाष्य करताना काळजी घ्यायला हवी. भविष्यात अशी चूक होऊ नये म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलणार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या निमित्ताने ‘ताई-दादा’ एकत्र येण्याच्या अनुषंगाने झळकलेले फलक या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यातून राजकीय अर्थ काढू नये. उद्धव आणि राज ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केले तरी गडचिरोलीपासून मुंबईपर्यंतच्या सर्व निवडणुका महायुतीच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांना आणीबाणी मान्य आहे. देशात अराजकता निर्माण करणाऱ्यांना मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणीबाणीचे संस्कार असलेल्यांकडून फार काही अपेक्षा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

