Dubai attack explosion near our hotel take us home soon marathi tourists plead with the government; आमच्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झालाय, आम्हाला लवकर घरी न्या; घाबरलेल्या मराठी पर्यटकांची सरकारला आर्त हाक
Dubai attack explosion near our hotel take us home soon marathi tourists plead with the government; आमच्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झालाय, आम्हाला लवकर घरी न्या; घाबरलेल्या मराठी पर्यटकांची सरकारला आर्त हाक
वाशिम: इराण-अमेरिका युद्धामुळे जगभरातील पर्यटकांची अडचण झाली असून युद्ध सुरू असलेल्या आखाती देशांमध्ये अनेक पर्यटक अडकले आहेत. महाराष्ट्रातीलही काही पर्यटक विविध ठिकाणी अडकले असून वाशिमच्या रिसोडमधील चार पर्यटक दुबईत अडकले आहेत. “आमच्या हॉटेलच्या शेजारी मेट्रो स्टेशनवर स्फ़ोट झाला, त्यामुळं आमची चिंता वाढली आहे, आम्हाला लवकर मायदेशी घेऊन जा,” अशी आर्त हाक या पर्यटकांनी सरकारला दिली आहे.
रिसोड येथील भगवान निर्बान, त्यांची पत्नी पदमाबाई निर्बान, मुलगा पवन निर्बान आणि सून नंदा निर्बान हे २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथून दुबईला पर्यटनासाठी गेले होते. पाच दिवसांचा दौरा पूर्ण करून २८ फेब्रुवारी रोजी अबू धाबी येथून पुण्याकडे परतण्याचे त्यांचे तिकीट आरक्षित होते. मात्र अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे विमानतळावरील उड्डाण सेवा स्थगित करण्यात आली आणि त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे.
रिसोड येथील निर्बान कुटुंबिय; वृद्ध आई वडील, भाऊ वाहिनी दुबईत अडकल्यामुळं चिंतेत असून लवकरात लवकर भारतात आणण्याची विनंती त्यांनी सरकारला केली आहे.
आखाती देशात मराठवाड्यातीलही ३४ प्रवासी अडकले
मध्यपूर्वेत इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेत युद्ध भडकले आहे. या युद्धाने आखाती देशातील जवळपास सहा ते सात देश युद्धाच्या सावटाखाली आले आहेत. या युद्धामुळे आखाती देशात गेलेले भारतातील अनेक पर्यटक, प्रवासी अडकले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर येथील तिघांसह मराठवाड्यातील ३४ जणांचा समावेश आहेत. सर्व भारतीय नागरिक सुखरूप असून त्यांच्या परतण्याबाबत प्रशासनाकडून कारवाई सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
मध्यपूर्वेतील इराण आणि इस्त्रायल या देशात भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धाने आखाती देशातील युएई, कतार, बहरीन यासह इतर देशांच्या हवाई सीमा बंद करण्यात आल्या आहेत. हवाई क्षेत्र बंद झाल्याने भारतातून या देशांमध्ये गेलेले प्रवासी अडकून पडले आहेत. विशेषतः दुबईत अडकलेल्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. मराठवाड्यातील ३४ प्रवासी मध्य पुर्वेतील देशात अडकले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
दरम्यान, मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा