Headlines

मॅरेथॉनसाठी ठाणे सज्ज; ३० हजार स्पर्धकांचा सहभाग, शहरातील वाहतुकीत बदल


Thane News: ३० ऑगस्ट रोजी होणार ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा.स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेमुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले.

ठाणे मॅरेथॉन
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, ठाणे:३२व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, रविवार, ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या या स्पर्धेसाठी आतापर्यंत ३० हजार स्पर्धकांची नोंदणी झाल्याचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. तसेच स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवण्याची मोहीमही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनही मैदानात उतरल्याचे चित्र आहे.

महापालिका ,पोलिस प्रशासन विभाग सज्ज

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका, पोलिस प्रशासन आणि सर्व संबंधित विभाग सज्ज झाले आहेत. विविध विभागांची संयुक्त पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. पावसाळी वातावरण, रस्त्यांची परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणावर सहभागी होणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे.

यंदा तब्बल ३० हजारांहून अधिक नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागी

पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, बॅरिकेडिंग, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, मोबाइल टॉयलेट्स आणि स्वयंसेवकांची नियुक्ती आदी तयारीचा आढावा आयुक्तांनी सर्व विभागांकडून घेतला. यंदा तब्बल ३० हजारांहून अधिक नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याने प्रत्येक सहभागी सुरक्षितपणे स्पर्धेत सहभागी होऊन सुखरूप घरी परत जाईल, यावर प्रशासनाचा भर असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियोजन

विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, शाळा, शिक्षक, बसचालक आणि स्वयंसेवकांशी समन्वय साधण्यात आला आहे.

Maharashtra TimesSamruddhi Mahamarg Robbery: महामार्गावर चोरट्यांची ‘समृद्धी’; टायर पंक्चरचा सापळा रचून 18 लाख लुटले, वकिलाच्या कुटुंबाला मारहाण

पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता

मॅरेथॉन स्पर्धेसाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. या बदलांमुळे ठाणे शहरातील पर्यायी मार्गांवर कोंडी होण्याची शक्यता आहे. शनिवार, २९ ऑगस्ट रात्री ८ ते रविवार, ३० ऑगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील.

अल्मेडा सिग्नल येथे प्रवेशबंदी

नितीन कंपनी येथून ठाणे महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर नितीन कंपनी येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने तीन हात नाका, हरिनिवासमार्गे वळविण्यात येतील. अल्मेडा सिग्नल येथून ठाणे महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना अल्मेडा सिग्नल येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने वंदना एसटी आगार, खोपटमार्गे वळविण्यात येतील.ज्ञानेश्वरनगर, आंबेवाडी आणि कामगारनगर नाका येथून यशोधननगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कामगारनगर नाका येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने इंदिरानगर नाका येथून वळविण्यात येतील.

Maharashtra TimesDombivli News: डोंबिवलीकर वाहतूक कोंडीने हैराण; रिक्षांच्या रांगेत प्रवाशांची होते फरफट

आज मार्गाची पाहणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे, त्या ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र, मॅरेथॉनच्या मार्गावरील खड्डे बुजवणे, अतिक्रमण हटवणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आणि रस्ते स्वच्छ ठेवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिल्या. तसेच शनिवार, २९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा