Kangana Ranaut : कंगना रणौतनं नुकत्याच एका मुलाखतीत ती जी काही बेधडक वक्तव्य करते, त्याबद्दल भाष्य केलं आहे. तसेच मी कुणाची कठपुतळी नाही, असंही कंगना म्हणाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत आजकाल तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. अशातच आता एका मुलाखतीत कंगना म्हणाकी की, ती भाजपची कठपुतळी नाही आणि पक्ष तिला पाठिंबा देईलच असं नाही. तसेच ती आजही अनेक दिग्दर्शकांच्या आवडती अभिनेत्री आहे, असं कंगना म्हणाली.
‘भाजप’बद्दल काय म्हणाली कंगना?
‘तुम्ही जी काही वक्तव्य करता, ती भाजपची अधिकृत भूमिका असते की तुमची स्वतःची?’ असं विचारलं असता कंगना म्हणाली, ‘मी माझ्या पक्षापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतेय, असं नाहीये. पण त्याच वेळी मला असं वाटतं की, जेव्हा खूप गोंधळ असतो, तेव्हा ओरडायलाच हवं. मी कधीकधी कठोर विधानं करते, पण मी ते मुद्दाम करत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की, मी कोणाची कळसुत्री बाहुली नाही. भाजप आज माझ्यासोबत आहे, उद्या असेल किंवा नसेल. मी दोन वर्षे खासदार राहिले आहे. मी २० वर्षे एक कलाकार आहे. माझं एक अस्तित्व आहे. मी उभी राहिले, तर २० पत्रकार मला ऐकायला येतील.’
Kangana Ranaut VS Genz | गटरछाप…आंदोलनाचे व्हिडीओ बघून मळमळतंय, खासदार कंगना रनौत काय बोलल्या?
कंगना पुढे म्हणाली, ‘मी नेहमीच म्हटलं आहे की, माझे विचार माझे स्वतःचे आहेत, माझी विचारधारा माझी स्वतःची आहे. ती अचानक नाहीशी होऊ शकत नाही. मी तसा प्रयत्न करते आणि मला कधीही दिखावा करावा लागत नाही. पण हो, कधीकधी चढ-उतार असू शकतात, ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो, पण मी अजून नवीन आहे आणि या गोष्टी थोड्या शिकतेय.’
Omkar Karve : अचानक मालिकेतून काढलं, आर्थिक तंगीमुळे केली शेती, झालं नुकसान; उदरनिर्वाहासाठी विकली रद्दी, मराठी अभिनेत्यानं सांगितला संघर्ष काळ पुढच्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला तिकीट मिळणार नाही, अशी भीती तुम्हाला कधी वाटते का? असं विचारलं असता कंगना म्हणाली, ‘मी याला भीती म्हणू शकत नाही. मला भीती वाटते की, मला तिकीट मिळणार नाही किंवा माझं अस्तित्वच संपून जाईल. मी एक अभिनेत्री, चित्रपट निर्माती, लेखिका आहे आणि मला माझं काम खूप आवडतं. मी अनेक दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री आहे. त्यापैकी बरेच जण वाट बघतायत. ते मला विचारतात की, मी इंडस्ट्री का सोडली? आयुष्यात अजून खूप काही करायचं आहे.’ ‘डीडी’न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कंगना बोलत होती.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा