Headlines

भारती सिंगचं एक पाऊल पुढे, सूत्रसंचालन आणि अभिनयानंतर आता ‘निर्माती’च्या भूमिकेत, चला हवा येऊ द्या’बद्दल काय म्हणाली?


Bharti Singh the indian game show:कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री भारती सिंग या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेळी एका वेगळ्या म्हणजेच निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे.

bharti singh the indian game show
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अदिती पवार, जे. पी. लॉ कॉलेज

छोट्या पडद्यावर विनोदीशैलीनं आपली स्वतंत्र छाप उमटवणारी भारती सिंग आता कॉमेडियन आणि सूत्रसंचालकापलीकडे जाऊन निर्माती म्हणूनही नवी जबाबदारी सांभाळणार आहे. भूमिका बदलल्या, जबाबदाऱ्या वाढल्या तरी प्रेक्षकांना मनापासून हसवणं महत्त्वाचं असल्याचं ती सांगते. पण ‘निर्माती’ हा मोठा शब्द ऐकून जशी ग्लॅमरस प्रतिमा डोळ्यांसमोर येते, तशी काही भावना अजून आपल्याला आली नसल्याचं ती मिश्कीलपणे सांगते. निर्माती होणं ही जबाबदारी मोठी असल्याचं ती मान्य करते. कलाकार म्हणून स्वतःच्या कामाकडे लक्ष देणं वेगळं आणि निर्माती म्हणून संपूर्ण कामाची जबाबदारी घेणं वेगळं आहे. त्यातच दोन मुलांची आई म्हणून घर आणि काम यातील समतोल साधताना तिची धावपळ वाढली असल्याचं ती नमूद करते.

Maharashtra TimesKishore Kumar Family : किशोर कुमार यांचे पूर्वज होते डाकू? अभिनेते अशोक कुमार यांनीच मुलाखतीत केला होता खुलासा!
सूत्रसंचालक आणि कॉमेडियनहीच आपली मूळ ओळख असल्याचं भारती सांगते. ‘सूत्रसंचालन आणि विनोद करणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, पण सूत्रसंचालन करताना मध्येच विनोद करायला मिळतो, त्याची मजाच काही वेगळीच असते’. कपिल शर्मा, सुदेश लहरी आणि जॉनी लीव्हर यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचं ती सांगते. “चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमाची शैली आणि त्यातील कलाकारांचं काम आवडायचं’, असं ती नमूद करते. विविध भाषांमधील विनोदाची शैली वेगळी असली, तरी प्रेक्षकांना हसवणं हा कॉमेडीचा समान धागा आहे, असं ती नमूद करते.

Maharashtra TimesKande Pohe Song: ‘कांदे पोहे’ सुनिधीला गायला द्यायची इच्छा नव्हती, ते अमृता सुभाषनं गायलं होतं’,अवधूत गुप्तेनं सांगितला ‘सनई चौघडे’ सिनेमातल्या सुपरहिट गाण्याचा किस्सा
आजच्या कॉमेडी शोज आणि त्यावर होणाऱ्या सेन्सॉरशिपच्या चर्चेवरही भारती स्पष्टपणे मत मांडते. ‘टीव्ही आणि ओटीटी या दोन्ही माध्यमांचं स्वरूप वेगळं आहे. काय पाहायचं आहे, याचं प्रेक्षकांना स्वातंत्र्य असायला हवं. विनोदाच्या नावाखाली कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजीदेखील घेतली गेली पाहिजे’. सोनी टीव्हीवरील ‘ द इंडियन गेम शो ‘ या कार्यक्रमानिमित्त भारती आणि हर्ष तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. विविध कलाकारांसोबत खेळ, टास्क आणि भरपूर मस्ती असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. हा कार्यक्रम म्हणजे भारतीसाठी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचं माध्यम आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा