Anjali Arora Troll : रीलस्टार अंजली अरोरा तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत असून ती माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘कच्चा बदाम गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंजली अरोरा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ती ‘महाकाव्य श्री रामायण कथा – श्री राम की’ या चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारणार आहे. मात्र, नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
अलीकडेच, अंजली अरोरानं तिचा आगामी चित्रपट ‘महाकाव्य श्री रामायण कथा – श्री राम की’ चा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला असून हा सिनेमा चर्चेचा विषय ठरला आहे.
यापूर्वी ‘लॉक-अप’मध्ये दिसलेली अंजली अरोरा, माता सीतेच्या भूमिकेत दिसल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा होत आहेत. काही नेटकऱ्यांनी अंजलीचं कौतुक केलं, तर काहींनी तिला ट्रोल केलं. नेटकऱ्यांनी अंजलीच्या चित्रपटाच्या टीझरची तुलना प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाशी केली. अंजलीला सर्वाधिक ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे आणि लोक तिला माता सीतेच्या भूमिकेसाठी निवडल्याबद्दल कास्टिंग डायरेक्टरवर टीका करत आहेत.
टीझरवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं की, ‘हे भगवान! ही आणि सीता?’, तर दुसऱ्याने लिहिलं, ‘हेच बघायचं बाकी राहिलेलं’, त्याचबरोबर ‘सीतेच्या भूमिकेसाठी चुकीची निवड’, ‘यापेक्षा जास्त सीतेचा अपमान कोणी केला नसेल’, ‘अंजलीला सीतेची भूमिका द्यायला नाही पाहिजे’, ‘सीतेचा का अपमान करताय?’, ‘बॉयकॉट’ अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
अंजली अरोराचा सिनेमा कधी प्रदर्शित होणार?
अंजली अरोराचा, ‘महाकाव्य श्री रामायण कथा – श्री राम की’ हा सिनेमा २५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिषेक सिंग दिग्दर्शित या चित्रपटात देव शर्मा रामाच्या भूमिकेत, तर शील शर्मा लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत. रजनीश दुग्गल आणि निर्भय वाधवा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा