नाशिकमधील खड्ड्यांवरून सामाजिक व राजकीय वातावरण तापले आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. सोमवारी (१७ ऑगस्ट) ठाकरेंच्या शिवसेनेने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले. नाशिक महापालिकेवर काढलेल्या या मोर्चात मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे या आंदोलनात प्रतिकात्मक यमराज देखील सहभागी झाले होते