Zee Marathi Serial Going To Off Air : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याबद्दल अभिनेत्रीनं पोस्ट करत माहिती दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – टीआरपीच्या यादीत टिकून राहण्यासाठी छोट्या पडद्यावर अनेक प्रयोग केले जातात. जुन्या मालिका संपवून नव्या मालिका सुरू केल्या जातात. तर काही वेळेस मालिकांमध्ये नवीन पात्र आणली जातात. अशातच आता झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यासंबंधी अभिनेत्रीनं पोस्ट शेअर केली आहे.
‘ शुभ श्रावणी ‘ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार
झी मराठीवर काही महिन्यांपूर्वी ‘शुभ श्रावणी’ ही मालिका सुरू झालेली. या मालिकेत वल्लरी विराजनं श्रावणीची भूमिका साकारलेली. तर सुमित पाटीलनं शुभंकर म्हणजेच शुभूची भूमिका साकारली होती. आता ‘शुभ श्रावणी’ ही मालिका संपणार आहे. मालिकेत श्रावणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वल्लरी विराजच्या एका पोस्टमुळे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
अभिनेत्रीची भावुक पोस्ट
वल्लरी विराजनं सोशल मीडियावर मालिकेतील श्रावणीच्या भूमिकेतील एक भावुक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती मालिकेच्या सेटवर बसलेली दिसत असून, पोस्टसोबत ‘श्रावणीसोबत शेवटचा दिवस’ असं लिहिलं आहे. त्यासोबतच ‘निरोप घेणं कठीण असतं, मग तुमची त्यासाठी कितीही तयारी असली तरीही.’ असंही अभिनेत्रीनं भावुक होत म्हटलं आहे. अभिनेत्रीची पोस्ट पाहून प्रेक्षकांना धक्का बसला आहे. अवघ्या सात महिन्यात ही मालिका गाशा गुंडाळणार आहे. मात्र, मालिकेच्या अंतिम भागाची किंवा ऑफ एअर होण्याची अधिकृत घोषणा वाहिनीकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे मालिका संपण्याचं नेमकं कारण काय असेल? आणि त्या जागी कोणती नवी मालिका सुरू होणार, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.
‘शुभ श्रावणी’ ही मालिका १९ जानेवारी २०२६ पासून झी मराठीवर सुरू झाली होती. ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित होते. या मालिकेत वल्लरी विराजसोबत लोकेश गुप्ते, आसावरी जोशी यांसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा