Kangana Ranaut On Gen Z : कंगना रणौतनं काही दिवसांपूर्वी जेन झींना ‘जनरेशन गटर’ म्हटलेलं. यावर आता अभिनेत्रीन स्पष्टीकरण दिलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – खासदार आणि अभिनेत्री बनलेल्या कंगना रणौतनं जेन झींना ‘जनरेशन गटर’ म्हटलेलं. या वक्तव्यामुळे कंगनाला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता, अभिनेत्रीनं तिच्या या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
कंगना रणौतचं ‘जनरेशन गटर’ वक्तव्यावर स्पष्टीकरण
बुधवारी एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना कंगना रणौतनं सांगितलं की, तिचं वक्तव्य विशेषतः स्वतःला कॉकरोच म्हणवणाऱ्यांना उद्देशून होतं. अभिनेत्री म्हणाली, ‘लोक स्वतःला कॉकरोच म्हणवतात आणि आपण म्हणतो की, झुरळं गटारातून बाहेर येतात, यात काय चुकीचं आहे? माझा मुद्दा काय आहे? जर लोक स्वतःला झुरळं म्हणत असतील आणि आपण म्हणतो की, गटार हे त्यांचं घर आहे, तर त्यांना मी बोललेल्याचं वाईट का वाटावं?’
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
काय घडलेलं नेमकं?
कंगनाने जंतर मंतर येथील ‘जेन झी’च्या आंदोलनावर जोरदार टीका केली होती. कंगनानं लिहिलेलं की, ‘जेन झी’च्या आंदोलनाचे हे व्हिडिओ किळसवाणे आहेत. ज्या प्रकारे ते बोलतात आणि जी भाषा वापरतात… मी माझ्या आयुष्यात इतका विचित्रपणा कधीच पाहिला नाही… मी त्यांना ‘जनरेशन गटर’ म्हणते. त्यांच्यापैकी काहींकडे व्यवस्थेला देण्यासारखं काहीच नाही. ते अभ्यासात चांगले नाहीत…तुम्ही स्वतःला झुरळ म्हणता आणि तुम्ही तसेच दिसता आणि वागता… त्यात कोणताही फरक नाही. या रील्सनी मला खूप अस्वस्थ केले आहमुळे मी खूप अवस्थ झाले आहे, मला स्वतःला सावरण्याची आणि डिजिटल डिटॉक्स करण्याची गरज आहे.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा