Apple iPhone Price Hike: नवीन आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲपल आगामी काळात आपल्या आयफोनच्या किमतींमध्ये मोठी वाढ करणार असून, नवीन मॉडेल्ससोबतच बाजारातील सध्याचे जुने मॉडेल्स देखील महाग होणार आहेत. चला याविषयीची सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया.

टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲपल आगामी काळात आपल्या आयफोनच्या किमतींमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी iPhone 18 Pro सिरीजच्या लाँचिंग दरम्यान नवीन मॉडेल्ससोबतच जुन्या आयफोन मॉडेल्सच्या किमती देखील भारतीय बाजारपेठेत तब्बल 10,000 ते 20,000 रुपयांपर्यंत वाढू शकतात.
किमती वाढण्यामागचे मुख्य ‘तांत्रिक’ कारण काय?
आयफोनच्या किमती वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे आगामी ‘iPhone 18 Pro’ सिरीजमध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक नेक्स्ट-जनरेशन २-नॅनोमीटर (2nm) प्रक्रियेवर आधारित एआय चिपसेट (A20 Pro Chip) हे आहे. तैवानची दिग्गज सेमीकंडक्टर कंपनी TSMC कडून या चिप्सचे उत्पादन केले जात असून, या नव्या तंत्रज्ञानाचा उत्पादन खर्च आधीच्या 3-नॅनोमीटर चिप्सपेक्षा खूप जास्त आहे. याशिवाय, ‘ॲपल इंटेलिजन्स’ (Apple Intelligence) चे प्रगत फीचर्स सुरळीत चालवण्यासाठी फोनमध्ये जास्त रॅम (RAM) आणि प्रगत कॅमेरा सेन्सर्स दिले जात आहेत, ज्याने फोनचा मेकिंग कॉस्ट वाढला आहे. (REF.)
नवीन आणि जुने मॉडेल्स महागणार?
ॲपलच्या दरवाढीचा हा फटका केवळ आगामी आयफोन 18 सिरीजलाच बसेल असे नाही, तर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर सिरीजवरही याचा परिणाम होऊ शकतो. जागतिक स्तरावर कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि प्रगत एआय चिप्स बनवण्याचा वाढलेला खर्च यामुळे ॲपल हा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. भारतात आगामी काळात ॲपलकडून हा सुधारित दर लागू केला जाण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करणे अधिक महाग होईल.
भारतातील किमतींवर नेमका काय परिणाम होईल?
भारतीय बाजारपेठेत आयात शुल्क आणि इतर स्थानिक करांमुळे आयफोनच्या किमती आधीच जागतिक बाजारापेक्षा जास्त असतात. जर ॲपलने मूळ किमतीत वाढ केली, तर भारतात सध्या मिळणारे बेस मॉडेल आणखी महाग होतील. तर Pro आणि Pro Max मॉडेल्सची सुरुवातीची किंमत थेट 1,50,000 ते 1,70,000 रुपयांच्या पार जाऊ शकते. स्थानिक पातळीवर भारतात आयफोनचे उत्पादन वाढत असले, तरी मुख्य सुटे भाग परदेशातूनच आयात करावे लागत असल्याने भारतीय ग्राहकांना या दरवाढीचा थेट फटका बसेल.

