Nashik News: पावसाने उशीरा हजेरी लावल्याने सुरूवातीला चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर जुलैमध्ये दिलासा तर मिळाला. परिणामी खरिपांच्या पेरण्यांना गती मिळाली. यामध्ये नाशिक विभागात ९४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या.आणि खरीप पेरणीत नाशिक अव्वल ठरलं

अव्वल स्थानी झेप
विभागातील २० लाख ३३ हजार २५४ हेक्टर इतके सर्वसाधारण पेरणी क्षेत्र असून, त्यापैकी १९ लाख २० हजार ९७५ हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे राज्यातील आठ कृषी विभागांपैकी नाशिक विभागाने खरीप पेरणीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
पेरणी क्षेत्रापेक्षाही जास्त क्षेत्रावर पेरणी
नाशिक विभागात नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांत ९७ टक्के, तर धुळे जिल्ह्यात ९३ टक्के आणि सर्वात कमी ८५ टक्के इतकी पेरणी नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. नागली, बाजरीची सर्वाधिक पेरणी नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. मक्याची सर्व चारही जिल्ह्यांत सर्वसाधारण पेरणी क्षेत्रापेक्षाही जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
खुरसणीची पेरणी केवळ नाशिक जिल्ह्यात
तुरीची जळगाव जिल्ह्यात सर्वाधिकपेरणीझाली आहे. उडीद, तीळ या पिकाची सर्वात कमी पेरणी नाशिक जिल्ह्यात झाली आहे. खुरसणीची पेरणी केवळ नाशिक जिल्ह्यात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सोयाबीनची सर्वसाधारण क्षेत्राच्या दुप्पट क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापसाची लागवडदेखील कोणत्याही जिल्ह्यात शंभर टक्के होऊ शकलेली नाही.
आठ विभागांमध्ये झालेली पेरणी (टक्केवारी)
.नाशिक – ९४%
. अमरावती -९३%
. पुणे -९२%
.कोल्हापूर-९०%
. छ.संभाजीनगर -९०%
. लातूर- ९०%
. नागपूर-८०%
. कोकण- ६६%
खरीप हंगाम विभागात जिल्हानिहाय झालेली पेरणी
जिल्हा वर्ष २०२६
नाशिक ९७
धुळे ९३
नंदुरबार ८५
जळगाव ९७
विभाग एकूण ९४

