भारतीय संघ सध्या ४८.१५ टक्के गुणांसह पाचवा आहे. ऑस्ट्रेलिया (८७.५०), दक्षिण आफ्रिका (७५), न्यूझीलंड (७२.२२) आणि बांगलादेश (५८.३३) यांनी भारतास मागे टाकले आहे. श्रीलंका ४१.६७ टक्के गुणांसह सहावे आहेत. भारतास त्यांच्या विजयापेक्षा ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशविरुद्धचा विजय जास्त फायदेशीर ठरेल. भारताने दोन्ही कसोटी जिंकल्या, तर भारताचे ५७.५८ टक्के गुण होतील. या परिस्थितीतही भारत पाचव्याच क्रमांकावर कायम राहील. हे गुण बांगलादेशला मागे टाकण्यासाठी पुरेसे नाहीत. अर्थात, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिका त्याच सुमारास आहे. ऑस्ट्रेलियाचे यश भारताच्या पथ्यावर पडेल. भारताने दोन्ही कसोटी जिंकल्या; तसेच बांगलादेश ऑस्ट्रेलियात विजयाविना राहिले, तरी भारत पाचव्या क्रमांकावर जाणार आहे.
Sourav Ganguly : सौरव गांगुली आणि पत्नी डोना यांना जीवे मारण्याची धमकी, महिनाभरापासून सुरु होता गंभीर प्रकार; पोलिसांत तक्रार दाखलश्रीलंकेने भारताविरुद्धची मालिका १-० जिंकली आणि बांगलादेश ०-२ पराभूत झाल्यास भारत ४२.४२ टक्के गुणांसह पाचवा राहील. मात्र, या परिस्थितीत श्रीलंकेने भारतास मागे टाकले असेल, श्रीलंकेने धवल यश मिळवले आणि बांगलादेशने एक कसोटी अनिर्णित राखली, तर भारत ३९.३९ टक्के गुणांसह सहाव्या क्रमांकावर घसरण्याचा धोका आहे.
West Indies Cricket : दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज अडचणीत, 2027 वनडे वर्ल्डकपमधील पात्रतेचा मार्ग कठीण! कारण काय?‘श्रीलंका क्रिकेट’ संघाविरुद्धच्या सराव सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादव गोलंदाजीस आला नाही. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत शंका घेतली जात आहे. मात्र, त्याला विश्रांती देण्यात आली होती, असे भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी स्पष्ट करून चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. भारत-श्रीलंकेदरम्यानची पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
भारताने सराव सामना जिंकल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत बहुतुले म्हणाले, ‘कुलदीपच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही प्रश्न नाही. त्याने पहिल्या डावात १८ षटके मारा केला होता; तसेच सामन्यापूर्वी तीन षटके गोलंदाजी केली होती. दुसऱ्या डावाच्या वेळी त्याला विश्रांती देण्यात आली होती.’ या सामन्यातील दुसऱ्या डावात रवींद्र जाडेजा, मानव सुतार आणि सारांश जैनला जास्त मारा करावा लागला. पहिल्या कसोटीतील पर्याय जाणून घेण्यासाठीच हा निर्णय झाला होता, असे सांगितले जात आहे.
Irfan Pathan : ‘तुझ्या आई-बापाने हेच शिकवलंय का?’; संगकारा इरफान पठाणवर का भडकला? 21 वर्षांनी वादाचं कारण समोर
सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीने फलंदाजांना साथ दिली होती. त्यानंतर फिरकी गोलंदाजांना त्याचा फायदा झाला होता. ‘मानव आणि जाडेजाने १४-१५ षटके मारा केला होता. त्यांना खेळपट्टीचे नेमके रंग जाणून घेण्यास त्यामुळे मदत झाली. त्यांची पहिल्या कसोटीसाठी चांगली पूर्वतयारी झाली आहे,’ असे बहुतुले यांनी सांगितले. सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनी कसब दाखवले
Ajinkya Rahane : काय रे! निवृत्तीनंतर मला पहिला फोन सचिन पाजीचा आलेला, एकच गोष्ट बोलले; अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासातिसऱ्या दिवशी फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर त्यांनी चेंडूवर चांगले नियंत्रण राखले, याकडे लक्ष वेधण्यात आले. ‘जाडेजा यापूर्वी श्रीलंकेत खेळला आहे. त्यामुळे त्याला येथे मारा कसा करावा याचा अनुभव आहे. मानव सुत्तार आणि सारांश जैनसारख्या नवोदित गोलंदाजांना येथील खेळपट्टी; तसेच वातावरणाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. चेंडूचा नेमका टप्पा आणि दिशा कशी असावी, आपण मारा करीत असताना क्षेत्ररचना कशी असावी, हेही त्यांनी जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे,’ असे बहुतुले म्हणाले.
फिरकीच केंद्रस्थानी
मालिकेच्या पूर्वतयारीत फिरकीचा सामना करणे केंद्रस्थानी
- गिलचे त्यास प्राधान्य, त्याचा सामना करण्यासाठी आग्रह
- तळाच्या फलंदाजांकडून अधिकाधिक सराव करून घेण्याचे संघव्यवस्थापनाचे लक्ष्य
- गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर प्रत्येक धाव मोलाची, या परिस्थितीत तळाच्या फलंदाजांकडून कामगिरीची अपेक्षा

