![]()
भारतीय राजकारण अशा वळणावर येऊन ठेपले आहे,जिथे सध्याच्या राजकीय कुरूक्षेत्रात भूतकाळ युद्ध लढतआहे. भूतकाळ आणि आठवणींची सेना सज्ज झालीआहे आणि इतिहासातील नायक जणू पुन्हा जिवंतहोऊन घोड्यावर स्वार होत आपल्या पक्षासाठी लढतआहेत. उत्तर प्रदेशच्या राजकीय पटलावर ही घटनाठळकपणे दिसून येते. उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचेवातावरण तयार होऊ लागले आहे. सर्व प्रतिस्पर्धीराजकीय पक्ष आपापल्या निवडणूक रणनीतीआखण्यात गुंतले आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये 1857 च्या संग्रामातील- ज्याला भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्रामही म्हटले जाते- दलित नायक वीरा पासी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या निमित्ताने त्यांनी दलित आणि उपेक्षितसमुदायांना राजकीयदृष्ट्या जोडण्याचा प्रयत्न केला.त्याच वेळी, एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही बहराइचमधील आपल्या पहिल्याच सभेत गाझी मियाँ यांच्या शौर्याचे आणि महानतेचे वर्णन केले.त्यांच्या स्मृतीचा वापर त्यांनी मुस्लिम समाजाच्याअस्मितेच्या जागृतीसाठी करण्याचा प्रयत्न केला.ओवेसी यांच्या रॅलीपाठोपाठ योगी आदित्यनाथ यांनीत्याला प्रत्युत्तर दिले. गाझी मियाँचा पराभव करून त्यांनामारणाऱ्या हिंदू सीमावर्ती समूहाच्या महाराजा सुहेलदेवयांच्या सन्मानाची मोहीम त्यांनी अधिक तीव्र केली.कोणत्याही परकीय आक्रमकाचे उदात्तीकरण करणेयोग्य नाही आणि याला विरोध केला जाईल, असे तेम्हणाले. लखनऊमध्ये राजा बिजली पासी यांच्याकिल्ल्याशी संबंधित आठवणी आणि त्यातीलप्रतीकात्मक शक्तीचा वापर राजकीय गटबाजीसाठीकरण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादीपार्टी यांच्यात नेहमीच रस्सीखेच सुरू असते.समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजालाआपल्याशी जोडण्यासाठी महर्षी परशुराम यांच्याप्रतीकांचादेखील वापर करत आहे. हे जाणून घेणे मोठे रंजक आहे की, हे बहुतेक नायकवैदिक काळापासून ते 1857 च्या संग्रामापर्यंतचे किंवात्याआधीचे आहेत. गांधी युग किंवा समकालीनइतिहासातील नायक यात नाममात्र आहेत. दुसरी गोष्टम्हणजे, या प्रक्रियेत बहुतेक नायक आणि त्यांच्या कथाकेवळ शैक्षणिक तथ्य न राहता राजकीय तथ्य बनल्याआहेत. तिसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्याशी संबंधित स्मृतीविविध सामाजिक समूहांच्या अस्मितेसाठी भावनिकखतपाणी घालतात. हा भावनिक आधारच त्यांनाराजकीय एकत्रीकरणासाठी तयार करतो. यावरून हेहीसिद्ध होते की, भूतकाळातील काही मुद्दे अजूनहीसुटलेले नाहीत, जे वर्तमानात एकमेकांत गुंतले आहेत.
यावरून असेही वाटते की, विकसित होत असलेल्यासमाजात जिथे अनेक सामाजिक गट पुढे जाण्याच्यास्पर्धेत आहेत, तिथे अस्मिता आणि आठवणींचा संघर्षहा विकास, सत्ता आणि सन्मानातील योग्यभागीदारीसाठी अपरिहार्य बनतो. विकसित समाजातही इतिहास आणि आठवणी आपल्यादैनंदिन जीवनाचा भाग असतातच, पण त्यांची भूमिकाबदलते. राजकीय गटबाजीपेक्षा त्यांची भूमिका तिथेअधिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक राहते. उदाहरणार्थ,चीन आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई देशांतइतिहास आणि आठवणी राजकारणापेक्षा प्रेरणा देण्याचेकाम करतात. समकालीन राजकारणात भूतकाळाचा राजकीय वापरवाढणे हे दर्शवते की, आपल्याकडील विकासाचेराजकारण आणि लोकशाहीच्या विस्ताराचा मार्ग अजूनअनेक संघर्षांतून जाणार आहे. जेव्हा हा भूतकाळ आणिअस्मितेचा बोध राजकारणातून बाहेर पडून जीवनदर्शन,ज्ञान-चर्चा आणि प्रेरणेचे घटक बनतील, तेव्हा भारताचाविकसित होण्याचा प्रवास अधिक सोपा होईल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) समकालीन राजकारणात भूतकाळाचाराजकीय हस्तक्षेप वाढणे हे दर्शवते की,आपल्याकडील विकासाचे राजकारण वलोकशाहीच्या विस्ताराचा मार्ग अजूनहीसंघर्षांतून जाणार आहे. उत्तर प्रदेशात जे काही घडत आहे, त्याकडे लक्ष ठेवा.
Source link
बद्री नारायण यांचा कॉलम:राजकारणात भूतकाळातील नायकच का प्रभावी आहेत?
