Headlines

मुंबई ते कोकण प्रवासासाठी नवा मार्ग, वसई रोड बायपास दुहेरी रेल्वे लाइनमुळे वेळ वाचणार; कुठून-कसा असेल मार्ग?| Maharashtra Times


Naigon-Juachandra Chord Line: पश्चिम रेल्वेवरून कोकणात किंवा दक्षिणेत जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या ट्रेनसाठी हा नवा मार्ग बनवण्यात येत आहे. वसई रोड येथे लागणारा वेळ वाचणार असून पश्चिम रेल्वेवरून नवी ट्रेन सुरू करणंही शक्य होणार आहे.

मुंबई ते कोकण रेल्वे
पालघर: महामुंबईच्या पश्चिम उपनगरांना कोकणाशी जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक नवा प्रकल्प हाती घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी अखेर हालचाली सुरू झाल्या आहेत. वसई-नायगाव-जुचंद्र जोडमार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने वन विभागाकडून या मार्गासाठी मंजुरीसाठी अर्ज केला आहे.

कसा असेल मार्ग?

जुलै २०२३ मध्ये भारतीय रेल्वेने या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. १७५.९९ कोटींचा खर्च या रेल्वे मार्गासाठी अपेक्षित आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर ५.७३ किमी लांब रेल्वे लाइन बांधण्यात येणार आहे. तसेच, मध्य रेल्वेच्या मार्गावर त्याला जोडणारी १.५ किमी लांब लाइन असेल. हा मार्ग पूर्ण झाल्यावर पश्चिम रेल्वे मार्गावरील नायगाव स्थानकाला मध्य रेल्वे स्थानकावरील जुचंद्र स्थानकाशी जोडण्यात येईल. यामुळे मुंबईहून कोकणापर्यंत थेट जोडण्यात येईल. यामुळे दादर, वसई रोड सारख्या स्थानकांवर न जाता थेट मुंबई ते कोकण प्रवास शक्य होणार आहे. पनवेलवरून निघणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना वसई रोड स्थानकावर न थांबता थेट पोहोचता येणार आहे. यामुळे प्रवासात ३० मिनिटं वेळ वाचणार आहे.

Maharashtra TimesGoregaon-Mulund Link Road: तलाव, टेकड्या, उद्यानाखालून जुळे बोगदे, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी ‘टीबीएम’ तयार; महत्त्वपूर्ण टप्पा सुरू होणार

या प्रकल्पात सर्वात मोठा अडथळा म्हणजे भूसंपादन प्रक्रिया. ८.०८ हेक्टर क्षेत्रावर हा मार्ग तयार करण्यात येणार आहे. यापैकी ३.७७ हेक्टर जमीन मिठागरावरून जात असून उर्वरित जमिनीच्या भूसंपादनासाठी २ एप्रिल रोजी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तब्बल १४.१ हेक्टर खारफुटीची जमीन असून या जमिनीचं ड्रोन सर्वेक्षण, वन विभागाकाडून तपासणी आणि झाडांची खूण करण्याची प्रक्रिया झाली असून त्यानंतर मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाणाऱ्या ट्रेन

या प्रकल्पाला वसई बायपास मार्ग असं ही नाव दिलं गेलं आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या नव्या जोगेश्वरी टर्मिनसचं काम सुरू आहे. हे टर्मिनस तयार झाल्यावर पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या वाढणार आहे. दक्षिणेकडे जाणाऱ्या ट्रेनसाठी हा नवा मार्ग महत्त्वाचा ठरेल. दरम्यान, दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकावरून दक्षिणेकडे जाणाऱ्या ट्रेनच्या इंजिनची दिशा वसई रेल्वे स्थानकाच्या इथे बदलावी लागते. या कामात ३० मिनिटं वेळ जातो. त्यामुळे केवळ मर्यादित गाड्या किंवा सुट्टयांसाठी सुरू केलेल्या विशेष गाड्याचं या मार्गावरून धावतात.

Maharashtra TimesKurla Junction: पाऊस पडताच कुर्ला जंक्शन पाण्याखाली, पुरमुक्तीसाठी हालचाली सुरू; महापालिकेकडून १३ कोटींच्या कामांचा प्रस्ताव

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईहून कोकणात जाणाऱ्या ट्रेनची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. पण मध्य रेल्वेवर ट्रेनची संख्या वाढवणं कठीण असल्यामुळे पश्चिम रेल्वेवरून ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. जोगेश्वरी टर्मिनस २०२७ मध्ये आणि ही मार्गिका २०२८-२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा