रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीतील दूषित पाणी आणि हवेमुळे शेतीचे अतोनात नुकसान होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याय, सोनगाव परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर धडक मोर्चा काढला. प्रदूषण करणाऱ्या सहा कंपन्यांवर कारवाई होत नसल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांसोबत आमदार भास्कर जाधव, माजी खासदार हुसेन दलवाई यांनी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.