दिल्लीतील आंदोलनानंतर मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेने आंदोलन सुरू केले आहे. मुंबई महापालिका व प्रशासनाविरोधात मनसेचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. ‘चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया’ असे म्हणत मनसे कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत.मुंबई पालिका आयुक्तांच्या कारभाराविरोधात मनसेने उघड टीका केली आहे.चेंबूरमध्ये झाड पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मनसेने आयुक्तांवर टीका केली.