Headlines

भारताचे सलग पराभव, टी-20 मालिकेआधी झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने जखमेवर मीठ चोळलं, नेमकं काय म्हणाला?


india vs Zimbabwe : भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. आगामी सीरिजच्या पार्श्वभूमीवर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा यांने मोठे वक्तव्य केले आहे. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या टीमला मागील दोन सीरिजमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे.

sikandar raza says series will not be one sided
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताला टी-२० वर्ल्डकप २०२६ जिंकल्यानंतर झालेल्या एकाही टी-२० सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. सूर्यकुमार यादवनंतर भारतीय टीमची जबाबदारी श्रेयस अय्यरवर देण्यात आली. पण त्याच्या नेतृ्त्वात टीमला सलग पराभवाचा ऐतिहासिक असा धक्का बसला आहे. आयर्लंडविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध भारताचा चार टी-२० सामन्यात मोठा पराभव झाला. इंग्लंडमधल्या पहिल्या सामन्यात पाऊस आल्याने तो अनिर्णित राहिला होता. त्यानंतर आता श्रेयस अय्यरची टीम २३ जुलैपासून झिम्ब्वाब्वे विरुद्ध तीन सामन्यांची सीरिज खेळणार आहे. आगामी सीरिजच्यापूर्वी झिम्ब्वाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा ने टीम इंडियाला आव्हान दिलं आहे. त्याने म्हटलंय की, दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समान संधी असून ही मालिका एकतर्फी होणार नाही, असा दावा रझाने केला आहे. कारण दोन्ही टीम तगड्या आहेत,आणि दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे, असं तो म्हणाला.

‘मालिका एकतर्फी होणार नाही’

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सिकंदर रझा म्हणाला, “या मालिकेत दोन्ही संघांकडे समान संधी असतील. आम्हाला आमच्या संघावर पूर्ण विश्वास आहे. आमचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे ही मालिका अतिशय रोमांचक होईल, असा मला विश्वास आहे.” झिम्बाब्वेने यंदा चांगली कामगिरी केली आहे. फेब्रुवारीमध्ये कोलंबो येथे झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव केला होता. याशिवाय श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्धही झिम्बाब्वेने विजय मिळवले आहेत. त्यामुळे भारताविरुद्धही संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे.

Maharashtra TimesIND vs PAK: भारत-पाकिस्तानचे दिग्गज पुन्हा आमनेसामने; एशियन लेजेंड्स लीगमध्ये कधी रंगणार महासंग्राम?

वैभव सूर्यवंशीवर असेल नजर

इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करता न आलेला १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेविरुद्ध छाप पाडण्यासाठी उत्सुक असेल. तो भारताचा सर्वात युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. आगामी मालिकेसाठी संजू सॅमसनला संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज प्रभसिमरन सिंगची निवड झाली आहे.

निवड समितीने वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि अशोक शर्मा यांना प्रथमच संघात संधी दिली आहे. हर्ष दुबेचाही १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. वरुण चक्रवर्ती दुखापतग्रस्त असल्याने रवी बिश्नोईला संघात स्थान मिळाले आहे.

Maharashtra TimesIND vs PAK: भारत-पाकिस्तानचे दिग्गज पुन्हा आमनेसामने; एशियन लेजेंड्स लीगमध्ये कधी रंगणार महासंग्राम?

भारताचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग, रवी बिश्नोई, हर्ष दुबे, प्रिन्स यादव आणि यश ठाकूर.

झिम्बाब्वेचा संघ

सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, बेन करन, ब्रेड इव्हान्स, क्लाईव्ह मदांडे (यष्टीरक्षक), टिनोटेंडा मापोसा, तदिवानाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाद्झा, डायोन मायर्स, रिचर्ड नगारवा, न्यूमन न्यामुरी, मिल्टन गुंबा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुजारबानी.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा