Headlines

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह लावाचा नवा फोन बाजारात, फीचर्सही खास। Maharashtra Times


लावा या भारतीय कंपनीने आपला नवीन ‘Lava Virat V1 Pro 5G’ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. या फोनमध्ये तब्बल 6,000mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि फोटोसाठी 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ग्राहकांना सिक्कीम मिडनाईट आणि स्पिती फ्रॉस्ट अशा दोन अतिशय सुंदर रंगांमध्ये खरेदी करता येईल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Lava Virat V1 Pro 5G । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
भारतात बजेट फ्रेंडली स्मार्टफोन शोधणाऱ्यांसाठी लावाने ‘Virat V1 Pro 5G’ हा एक चांगला पर्याय आणला आहे. 50-मेगापिक्सल कॅमेऱ्यामुळे उत्तम फोटोग्राफी आणि 6,000mAh बॅटरीमुळे दीर्घकाळ बॅकअप मिळणार आहे. आकर्षक फीचर्ससह हा फोन सिक्कीम मिडनाईट आणि स्पिती फ्रॉस्ट या दोन रंगांच्या पर्यायात आणि किफायतशीर किमतीत लाँच करण्यात आला आहे.

स्मार्टफोनचे मुख्य स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

6,000mAh ची तगडी बॅटरी

या फोनचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे याची 6,000mAh क्षमता असलेली बॅटरी. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बॅटरी एका चार्जवर 40 तासांचा टॉकटाईम, 650 तासांचा स्टँडबाय आणि सलग 760 मिनिटांचा युट्युब प्लेबॅक देऊ शकते. चार्जिगसाठी यामध्ये युएसबी टाइप-सी (USB Type-C) पोर्टसह 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

50MP AI मुख्य कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या फोनच्या पाठीमागे चौकोनी आकाराच्या (Square-shaped) मॉड्यूलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात मुख्य कॅमेरा 50-मेगापिक्सलचा AI सेन्सर आहे. कॅमेरा ॲपमध्ये नाईट मोड, एचडीआर, पोर्ट्रेट, फिल्म, प्रो मोड आणि मोशन फोटो यांसारखे विविध फीचर्स मिळतात. या कॅमेऱ्याने 30fps वर 2K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. तसेच सेल्फीसाठी समोर 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

प्रोसेसर आणि डिस्प्ले

Lava Virat V1 Pro 5G मध्ये ६nm आर्किटेक्चरवर आधारित ऑक्टा-कोर Unisoc T8200 प्रोसेसर वापरण्यात आला आहे, ज्याचा AnTuTu बेंचमार्क स्कोअर 5,00,000 पेक्षा जास्त आहे. फोनमध्ये 6.75 इंचाचा HD+ LCD स्क्रीन आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

स्टोरेज आणि सॉफ्टवेअर

या फोनमध्ये 6GB रॅम व्यतिरिक्त आणखी 6GB व्हर्च्युअल रॅम (Virtual RAM) वाढवण्याची सुविधा आहे. फोनचे 128GB स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन अँड्रॉइड 16 (Android 16) ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कंपनीने या फोनसाठी एक ओएस अपग्रेड (OS Upgrade) आणि दोन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे वचन दिले आहे.

इतर फीचर

धूळ आणि पाण्याच्या शिंतोड्यांपासून संरक्षणासाठी या फोनला IP64 रेटिंग मिळाले आहे. सुरक्षेसाठी यामध्ये साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर उपलब्ध आहे. याशिवाय, लाव्हा कंपनी ग्राहकांना त्यांच्या घरपोच मोफत सेवा देणारी ‘Lava Free Service @ Home’ ही सुविधा देखील संपूर्ण भारतात पुरवणार आहे.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा