आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला रणदीप हुड्डा, तर ‘देशसेवा’ करणारे कुठेत? म्हणत राखी सावंतची कंगना रणौत आणि रवी किशन यांच्यावर टीका
मुंबई: आसाममध्ये अनेक जिल्ह्यांत भीषण पूरस्थितीमुळं लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या कठीण काळात बॉलिवूडही आसामच्या मदतीसाठी पुढं आलं आहे. अनेक कलाकारांनी पूरग्रस्तांची मदत केली आहे. तर अभिनेता रणदीप हुड्डा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलात उतरला आहे. आसाममधील शिवसागर जिल्ह्यात जाऊन रणदीपनं प्रत्यक्ष पूरग्रस्तांची भेट घेतली आणि गुडघाभर पाण्यात उतरून लोकांना…
