उद्धव ठाकरेंना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच लोक सोडून गेले:त्यांनी काँग्रेसचे पाय धरले, त्यामुळे शिवसैनिकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला- श्रीकांत शिंदे
उद्धव ठाकरे यांना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच आज त्यांच्यावर कुठल्यातरी मंगल कार्यालयात जाऊन सभा घेण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हे आत्ता कुठे घराबाहेर पडले आहेत आणि बाहेर पडून लोकांना ‘गद्दार-गद्दार’ म्हणून हिणवत आहेत. मात्र, कालपर्यंत हेच लोक जेव्हा तुमच्यासोबत होते, तेव्हा ते चांगले होते आणि आता अचानक गद्दार कसे झाले? असा सवाल करत शिवसेना खासदार…
