Ashram School Student Deaths: दोन वर्षांत आश्रमशाळांमध्ये चारशे मृत्यू? राज्यातील 22 प्रकल्पांमधील धक्कादायक स्थिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिंनीचा मृत्यू झाल्यानंतर आदिवासी विभागाची लक्तरे पुन्हा वेशीला टांगली गेली आहेत. दोन वर्षांत २२ प्रकल्पांमध्ये चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक आकडेवारी असून, प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. राज्यात आदिवासी विकास विभागातर्फे ५५१ अनुदानित, तर ४९३ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये साडेचार लाखांहून…
