R Ashwin on Kuldeep Yadav : इंग्लंडमध्ये तिनही एकदिवसीय सामन्यांमध्ये कुलदीप यादवला संघी मिळाली नाही. लॉर्ड्स वनडेमध्ये भारतीय गोलंदाजांनी ३८७ धावा दिल्या. या सगळ्यावरुन आर अश्विनने संघ व्यवस्थापनावर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला इंग्लंडमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कुलदीप टी-२० संघातही नव्हता. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याला संधी मिळाली होती, पण मैदानात मात्र तो उतरला नाही. एकाही सामन्यात त्याची निवड झाली नाही.पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघाने वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना फिरकीसाठी संघी दिली. कारण ते फलंदाजीही करु शकणारे खेळाडू आहेत. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळला नाही. संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश झाला त्यात मात्र कुलदीपला बेंचवरच बसावं लागलं.
गौतम गंभीर प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यापासून भारताने १०४ सामने खेळले आहेत. यामध्ये कुलदीपला फक्त ३८ सामन्यांत संधी दिली गेली. त्यामुळे अश्विनने सांगितलं की, कुलदीपने खेळूच नये, त्याची आवश्यकता नाही. हा काळ फलंदाजांचा आहे. त्यांना गोलंदाजांचा आत्मविश्वास आणि लय कधीच समजत नाही. मी भारतीय क्रिकेटचा मोठा चाहता आहे. मी नेहमीच भारतीय क्रिकेटला कसा फायदा होईल याचा विचार करतो, असं अश्विनने म्हटलं आहे.
त्याने पुढे बोलताना म्हटंल की, कुलदीप सध्या अअशा टप्प्यावर पोहोचला आहे. जिथे तो वयाच्या ३५-३६ वर्षांपर्यंत खेळू शकतो. त्याचा खेळही चांगला आहे. नुकताच तो आयपीएल ट्रेडमध्येही दाखल झाला होता. पण इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेनंतर चित्र पूर्णपणे बदललं आहे. बुमराह नसतानाही कुलदीपला संधी मिळत नसेल, तर याचा एकच अर्थ होतो. टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावर शून्य विश्वास आहे, त्याने आपलं सामान बांधून परत यायला हवं होतं” असं अश्विन म्हणाला.
अश्विन पुढे सांगितलं की, “कुलदीप आणखी अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. पण त्याच्यावर अपेक्षित विश्वास दाखवला जात नाही. तो संघाच्या भविष्यातील योजनांचाच भाग आहे की नाही, हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येक प्रशिक्षक किंवा कर्णधाराचे काही आवडते खेळाडू असतात, हे वास्तव आहे. पण कुलदीपच्या बाबतीत जे घडत आहे, ते खूपच विचित्र आहे. इंग्लंड दौऱ्यातील हा निर्णय त्याच्यासाठी मोठा धक्का ठरला.”
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा