Maharashtra Politics : “मी तुमच्या उत्साहामुळे विसरायला लागलो. मला खरंच सुचत नाही, मी परत येतो थांबा” असं म्हणून अमित ठाकरे मंचावरुन खाली उतरले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. भाषण करताना अमित ठाकरे काही काळ अडखळले, तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो, असं म्हणत ते मंचावरुन उतरुन खाली गेले आणि पाच मिनिटांनी पुन्हा व्यासपीठावर येऊन भाषण करु लागले.
अमित ठाकरे काय म्हणाले?
सुरुवातीला भाषणाला उभं राहताना अमित ठाकरे म्हणाले, “थोड्या घोषणा द्या म्हणजे मला भाषण आठवेल. ज्या विद्यार्थी, तरुणांनी रस्त्यावर उतरत आंदोलन करुन, केंद्रातून राजीनामा आणला, त्यांचं आणि पालकांचं अभिनंदन. मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलो नसतो. ते माझे वडील आहेत म्हणून बोलत नाही, तर प्रामाणिक माणूस आहे म्हणून सांगतो. तुमच्यासारखे सहकारी नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. आपण आतापर्यंतची आंदोलनं विसरलो पाहिजे, पुढे जायला पाहिजे” असं सांगतानाच “मी तुमच्या उत्साहामुळे विसरायला लागलो आहे. मला खरंच सुचत नाहीये, मी परत येतो थांबा” म्हणून अमित ठाकरे मंचावरुन खाली उतरले.
“मी खरंच काही पाठ करुन आलो नाही. तुमच्या ताकदीने धडकी भरली. आधीचं आठवतंय ना की परत बोलू? आपण विद्यार्थ्यांना व्हॅनमधून बाहेर काढत होतो. हा कॉन्फिडन्स माझ्यात कुठून आला? तर तुमची ताकद आणि राज ठाकरे नावाची शक्ती माझ्या मागे आहे. त्यावेळी पोलीस शांत होते. घाबरले होते का? तर नाही! महाराष्ट्र पोलीस आहेत ते. त्यांना आदरयुक्त दरारा होता. त्यांना माहिती की त्यांच्यासाठी कोणी उभं राहत असेल तर राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक. आपली ताकद समजून घेतली पाहिजे.” असं अमित ठाकरे म्हणाले.
“मी राजकारणी नाही, मला बोलता येत नाही. आपल्या राज्यात, देशात काय चालू आहे हे मला माहिती आहे. गेल्या एक वर्षात भीषण परिस्थिती पाहिली. खिळे लावून काठ्या घालतात, मुलींवर हात टाकतात, कपडे फाडतात. ते चंद्रकांत दादा पाटील काय बोलले… दिल्ली पोलिसांनी दगड उचललेत, त्यावरील फिंगर प्रिंट आधारशी लिंक करणार. या मुलांनी केंद्रातून राजीनामा आणला, राज्यातून आणायला वेळ नाही लागणार. मला मारा-मला मारा म्हणणारा तो मुलगा नागपूरचा आहे. फडणवीसांच्या शहरातला. पण मुख्यमंत्र्यांना त्याच्यावर बोलावंसं वाटलं नाही” असंही अमित ठाकरे म्हणाले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा