Tukaram Mundhe Nagpur : नागपूरातील एका कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावली. अन्न व औषध प्रशासनाच आयुक्त पद त्यांच्याकडे असल्याने कामाच्या वेळी येणारे अनुभव आणि बाहेर खाण्यात येणारे पदार्थ याबाबत त्यांनी आपली मते मांडली यावेळी सावजी जेवणावर केलेले वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

तुकाराम मुंढे काय म्हणाले
‘माझ्यासारख्या माणसांनी सावजी जेवण घेतले, तर आमचा किमान एक महिना रुग्णालयात जाईल,’ असे वक्तव्य मुंढे यांनी नुकतेच नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात केले होते. सावजी जेवणाबाबतचा त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंढे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
‘सावजी मटण किंवा सावजी जेवण हा केवळ खाद्यपदार्थ नसून नागपूर आणि विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेचा, खाद्यसंस्कृतीचा व अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. अशा परंपरेबाबत अवमानकारक किंवा सर्वसाधारण स्वरूपाची विधाने करणे अत्यंत दुर्दैवी आहे,’ अशा शब्दांत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी मुंढे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
खाद्यसंस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही.
‘कोल्हापूरमधील नागरिकही अति तिखट खाद्यपदार्थ खातात. मग त्यांना हार्ट अटॅक का येत नाही? एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक अनुभव संपूर्ण खाद्यसंस्कृतीवर लादणे योग्य नाही. एखादा पदार्थ एखाद्याला मानवत नसेल, तर तो त्याचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. मात्र, त्यावरून खाद्यसंस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही.
अस्मितेचा अवमान होणार नाही,काळजी घेणे आवश्यक
सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी कोणत्याही प्रदेशाच्या संस्कृती, परंपरा आणि स्थानिक भावनांचा आदर राखून वक्तव्य करावे. मतभेद व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र, त्यातून प्रदेशाच्या अस्मितेचा अवमान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे,’ असे मासुरकर म्हणाले.
सावजी जेवण म्हणजे नक्की काय
सावजी हा महाराष्ट्रातील झणझणीत जेवणाचा प्रकार आहे. हे सावजी जेवण मसाल्यांच्या विशिष्ट चवीसाठी ओळखले जाते.यात वापरले जाणारे ३२ हून अधिक प्रकारचे खडे मसाले. हे घरीच विशेष पध्दतीने बनवलेले असतात.ज्याला सावजी मसाला म्हणतात.
सावजी प्रकार स्पेशली कोठे मिळतो.
सावजी जेवण हे महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात आणि विशेषता नागपूरमध्ये मिळते.त्यामुळे सावजी मटन आणि सावजी जेवण हे विदर्भ नागपूरचे फेमस आहे . नागपूरात झालेल्या एका आयोजित कार्यक्रमात राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणाबद्दल त्यांचे मत मांडले.
Jalna Rain News: राजूरकर कोठा गाव चिखलात रुतल; पावसाळ्यात चार महिन्यात जनजीवन विस्कळीत
जेवणाबाबत केलेलं वक्तव्य मुंढे यांनी तातडीने मागे घ्याव
परंतु त्यांच मुंढे यांच वक्तव्य विदर्भातील जनतेला पटले नाही़.त्यामुळे सावजी जेवणाबाबत केलेलं वक्तव्य मुंढे यांनी तातडीने मागे घ्याव अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने केली .

