Headlines

सकाळी 6 वाजताच मैदानावर पोहोचायचा किंग कोहली; 11 वर्षांनंतर कोचने उघड केलं कारण, इंग्लंड दौऱ्याशी आहे कनेक्शन


Ind vs Eng ODI 2026 : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली तब्बल सहा महिन्यांनंतर पुनरागमन करत आहे. त्याआधी माजी बॅटिंग कोच संजय बांगर यांनी २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने घेतलेल्या विशेष सरावाचा खुलासा केला आहे. या तयारीमागचं गुपित नेमकं काय होतं, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

Sanjay Bangar on Virat Kohli vs England
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये आज शेवटचा पाचवा खेळवला जाणार आहे. या सीरिजमध्ये भारताची कामगिरी खूप सुमार झाली आहे. त्यामुळे आता फॅन्सचे डोळे वनडे सीरिजकडे लागलेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन मॅचेसच्या वनडे सीरिजला १४ जुलैपासून सुरुवात होतेय. या सीरिजमधून भारताचा माजी कॅप्टन विराट कोहली संघात पुनरागमन करतोय. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये दुखापतीमुळे विराट खेळू शकला नव्हता. त्यामुळे तब्बल ६ महिन्यांनंतर तो पुन्हा एकदा भारतीय जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे.

दुसरीकडे, इंग्लंडच्या कठीण परिस्थितीने भारतीय टी२० संघाची पार दैना उडवलीये. श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत खेळणाऱ्या टीम इंडियाची पहिली मॅच पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यानंतर लागोपाठ तीन टी२० मॅचेसमध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला असून आता टीमवर क्लीन स्वीपचं संकट घोंगावतंय. दरम्यान, भारताचे माजी बॅटिंग कोच संजय बांगर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. विराट कोणत्याही मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारीनेच मैदानात उतरतो, असं बांगर यांनी म्हटलंय.

Maharashtra TimesTeam India : वैभव सूर्यवंशीवरुन निवडकर्त्यांना सुनावलं, भावनिक होऊन निर्णय घेतला; माजी क्रिकेटर रोखठोक बोलला

“आमचा दिनक्रम खूप कठीण असायचा”

‘दूरदर्शन’च्या एका शोमध्ये बोलताना बांगर यांनाी २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाने केलेल्या तयारीचे काही रंजक किस्से शेअर केलेत. इंग्लंडमधील आव्हानं आणि त्याआधी विराटने घेतलेले अतोनात कष्ट यावर बांगरांनी उघडपणे भाष्य केलं. बांगर म्हणाले की, “जेव्हा तुम्ही इंग्लंडला जाता, तेव्हा सगळ्या गोष्टी दोनच मुद्द्यांवर ठरतात. तुम्ही स्विंग बॉल किती चांगला खेळता आणि चेंडू शरीराच्या किती जवळ (लेट) खेळू शकता. विराट कोहलीसाठी २०१४ चा इंग्लंड दौरा अतिशय वाईट ठरला होता. त्यामुळेच २०१८ च्या दौऱ्यापूर्वी विराटने आपल्या याच कमजोरीवर प्रचंड काम केलं. आमचा सराव खूप कठीण असायचा. इंग्लंडसारख्या वातावरणाचा अंदाज यावा म्हणून आम्ही सकाळी ६ किंवा ६:३० वाजताच मुंबईच्या ग्राउंडवर पोहोचायचो, जेणेकरून सकाळच्या दवबिंदूंचा (ओस) फायदा घेता येईल. खेळपट्टी न झाकता, सकाळच्या ओलाव्याचा आम्ही सरावासाठी पूर्ण वापर करायचो.”

“…आणि आम्ही खेळपट्टीवर पाणी टाकायचो!”

बांगर यांनी सरावाचा पुढचा थरार सांगताना म्हटलं की, “एकदा का ऊन पडलं आणि खेळपट्टीवरील ओलावा कमी झाला, की आम्ही चेंडू स्विंग व्हावा यासाठी मुद्दाम पिचवर पाणी टाकायचो. विराटने अशा कठीण परिस्थितीत तासनतास आणि वारंवार सराव केला. काही सेशन्ससाठी अजिंक्य रहाणेसुद्धा आमच्यासोबत जोडला गेला होता. आमच्या ३-४ मुख्य बॅट्समननी इंग्लंडसारख्याच हुबेहूब परिस्थितीतसराव करून आपली बॅटिंग सुधारली होती. याच कडक तयारीमुळे आम्ही इंग्लंडमध्ये मॅचेस जिंकण्यात यशस्वी ठरलो.”

विराटला फिटनेस क्लिअरन्सची प्रतिक्षा

विराट कोहलीला फिटनेस क्लिअरन्स मिळण्याच्या अटीवर इंग्लंडविरुद्धच्या तीन मॅचेसच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघात निवडण्यात आलंय. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना विराटच्या स्नायूंना दुखापत झाली होती. याच कारणामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजला मुकला होता.

Maharashtra TimesIND W vs ENG W Test : ऐतिहासिक कसोटीत भारत पहिल्या दिवशी 285 वर ऑल आऊट; स्मृती, हरमनप्रीत आणि दीप्तीची अर्धशतके

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताची वनडे टीम

शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली (फिटनेसवर अवलंबून), श्रेयस अय्यर (व्हाईस कॅप्टन), केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, गुरनूर बराड

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा